शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 16:26 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार तथा करविषयक पुस्तकांचे लेखन करणारे अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली होती. या भेटीवर आधारित लेखमाला त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिली. आज या लेखमालेचा शेवटचा बारावा भाग.

बांगला देशात मी खूप काही फिरलो नाही, पण एकूणच जी मोठमोठी पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील आहे, जागरूक आहे, त्यावरून येणाऱ्या पाच वर्षांनी बांगला देश नक्की वेगळा असेल असे मला वाटते.आपल्या देशातून गंगा निघते ती या देशात नवाबगंजजवळ पद्मा होते. पुढे मेघनाला जाऊन मिळते आणि मेघना होऊनच बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेचे पात्र आसामपासून भारतातील भागात ते बांगला देशात शिरेपर्यंत आणि पुढेही खूप विशाल आहे. बांगला देशात तिही पुढे पद्मा नदीला जाऊन मिळते आणि पद्मा पुढे मेघनाला. पद्मा नदीला या देशाची जीवनदायिनी म्हणतात.बांगला देश स्वतंत्र झाल्यावर भारताने मार्च १९७२ मध्ये त्यांच्याशी १२ कलमी शांतता करार केला होता. भारताने २०१७ ला संपलेल्या ७ वर्षात त्यांना ६०,८०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विदेश मंत्रालयाने भारत-बांगला देश संबंधावर सप्टेंबर २०१७ मध्ये एक विशेष पत्रिका जाहीर केली आहे. त्यात दोन्ही देशात झालेले विविध करार आणि अनेक पातळ्यांवर संबंध विकसित कसे होत आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे.त्यातली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. भारतातून वाहणाºया ५४ नद्या बांगला देशात जातात. त्यामुळे बांगला देशातल्या नद्यांच्या सफाईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भारत मोठे आर्थिक सहाय्य करीत आहे. साधारण ४०० कोटी रुपये खर्चाच्या ८० टक्के खर्च भारत देतोय. त्यामागे अर्थातच भारताचा स्वार्थही आहेच. आसामसह पूर्वोत्तरची सातही राज्ये जलमार्गाने बांगला देशच्या चित्तगोंग बंदराशी थेट जोडली जातील. तेथून थेट आयात-निर्यात जगभरात होऊ शकते. पर्यायाने ती सातही राज्ये उर्वरित जगाशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. याचा खूप मोठा फायदा आपल्या पूर्वोत्तर राज्यांना व भारताला होईल हे निश्चित.एक विलक्षण गोष्ट सांगून ही साठा उत्तराची प्रवासकथा, लोकमत आणि खास करून जळगावचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे अत्यंत मन:पूर्वक आभार मानून, बारा उत्तरी थांबवतो.बांगला देशाचे राष्ट्रगीत- ‘आमार शोनार बांगला, आमी तोमाय भालोबाशी, चिरोदिन तोमार आकाश, तोमार बाताष आमार प्राणे बजाय बाशी...’ लोकसंगीतात बांधलेले हे सुंदर गीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वत:च्या बंगाल राज्याची महती म्हणून लिहिले आहे. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मूळ गीतातल्या पहिल्या दहा ओळी या देशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या. समर दास या प्रसिद्ध संगीतकाराने ते राष्ट्रगीत वाटावे म्हणून नव्याने संगीतबद्ध केले. हे राष्ट्रगीत मी तेथे रोटरीच्या सभेत ऐकले. एकाच कवीची दोन गीते दोन शेजारी राष्ट्रांची राष्ट्रगीते आहेत हा विलक्षण आणि जगात एकमेव योग. बांगला देश आणि भारत यांचा हा अनोखा संबंध एका कवीने त्यांच्या स्वत:च्याही नकळत बांधून दिला, कायमचा. कवी कोणत्याही देशाच्या कसा सीमापार असतो हे चक्षुर्वैसत्यम पाहून गुरुदेवांना मी मनोमन वंदन केले आणि बांगला देशाचा निरोप घेतला. (समाप्त)-अनिलकुमार शाह, जळगावमोबा. ९४२२२ ७६ ९०२

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव