शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 16:26 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार तथा करविषयक पुस्तकांचे लेखन करणारे अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली होती. या भेटीवर आधारित लेखमाला त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिली. आज या लेखमालेचा शेवटचा बारावा भाग.

बांगला देशात मी खूप काही फिरलो नाही, पण एकूणच जी मोठमोठी पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील आहे, जागरूक आहे, त्यावरून येणाऱ्या पाच वर्षांनी बांगला देश नक्की वेगळा असेल असे मला वाटते.आपल्या देशातून गंगा निघते ती या देशात नवाबगंजजवळ पद्मा होते. पुढे मेघनाला जाऊन मिळते आणि मेघना होऊनच बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेचे पात्र आसामपासून भारतातील भागात ते बांगला देशात शिरेपर्यंत आणि पुढेही खूप विशाल आहे. बांगला देशात तिही पुढे पद्मा नदीला जाऊन मिळते आणि पद्मा पुढे मेघनाला. पद्मा नदीला या देशाची जीवनदायिनी म्हणतात.बांगला देश स्वतंत्र झाल्यावर भारताने मार्च १९७२ मध्ये त्यांच्याशी १२ कलमी शांतता करार केला होता. भारताने २०१७ ला संपलेल्या ७ वर्षात त्यांना ६०,८०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विदेश मंत्रालयाने भारत-बांगला देश संबंधावर सप्टेंबर २०१७ मध्ये एक विशेष पत्रिका जाहीर केली आहे. त्यात दोन्ही देशात झालेले विविध करार आणि अनेक पातळ्यांवर संबंध विकसित कसे होत आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे.त्यातली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. भारतातून वाहणाºया ५४ नद्या बांगला देशात जातात. त्यामुळे बांगला देशातल्या नद्यांच्या सफाईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भारत मोठे आर्थिक सहाय्य करीत आहे. साधारण ४०० कोटी रुपये खर्चाच्या ८० टक्के खर्च भारत देतोय. त्यामागे अर्थातच भारताचा स्वार्थही आहेच. आसामसह पूर्वोत्तरची सातही राज्ये जलमार्गाने बांगला देशच्या चित्तगोंग बंदराशी थेट जोडली जातील. तेथून थेट आयात-निर्यात जगभरात होऊ शकते. पर्यायाने ती सातही राज्ये उर्वरित जगाशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. याचा खूप मोठा फायदा आपल्या पूर्वोत्तर राज्यांना व भारताला होईल हे निश्चित.एक विलक्षण गोष्ट सांगून ही साठा उत्तराची प्रवासकथा, लोकमत आणि खास करून जळगावचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे अत्यंत मन:पूर्वक आभार मानून, बारा उत्तरी थांबवतो.बांगला देशाचे राष्ट्रगीत- ‘आमार शोनार बांगला, आमी तोमाय भालोबाशी, चिरोदिन तोमार आकाश, तोमार बाताष आमार प्राणे बजाय बाशी...’ लोकसंगीतात बांधलेले हे सुंदर गीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वत:च्या बंगाल राज्याची महती म्हणून लिहिले आहे. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मूळ गीतातल्या पहिल्या दहा ओळी या देशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या. समर दास या प्रसिद्ध संगीतकाराने ते राष्ट्रगीत वाटावे म्हणून नव्याने संगीतबद्ध केले. हे राष्ट्रगीत मी तेथे रोटरीच्या सभेत ऐकले. एकाच कवीची दोन गीते दोन शेजारी राष्ट्रांची राष्ट्रगीते आहेत हा विलक्षण आणि जगात एकमेव योग. बांगला देश आणि भारत यांचा हा अनोखा संबंध एका कवीने त्यांच्या स्वत:च्याही नकळत बांधून दिला, कायमचा. कवी कोणत्याही देशाच्या कसा सीमापार असतो हे चक्षुर्वैसत्यम पाहून गुरुदेवांना मी मनोमन वंदन केले आणि बांगला देशाचा निरोप घेतला. (समाप्त)-अनिलकुमार शाह, जळगावमोबा. ९४२२२ ७६ ९०२

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव