शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST

भुसावळ : रेल्वे ऑपरेशन्समध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान असलेल्या मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना (मुंबई विभागातून ...

भुसावळ : रेल्वे ऑपरेशन्समध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान असलेल्या मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना (मुंबई विभागातून तीन आणि नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून प्रत्येकी दोन) "महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार" प्रदान केला. यात भुसावळचे बबलू शेख मोहिउद्दीन व परशुराम यादव यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी यांच्या हस्ते मुंबईत १३ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पुरस्कारात प्रशस्तिपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि दोन हजार रुपये रोख आहे. ऑगस्ट २०२१ महिन्यात कर्तव्यावर असताना संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेसाठी आणि त्वरित केलेल्या कारवाईसाठी निवडले गेले.

भुसावळ येथील पॉइंट्समन परशुराम यादव यांनी खेरवाडी स्थानकात ०४१५२ डाउन विशेषच्या तृतीय वातानुकूलित डब्ब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग पाहिल्यामुळे मोठी अनुचित घटना टळली. तसेच भुसावळ यार्डमध्ये तुटलेली टंग रेल (रूळ) लक्षात आणणारे भुसावळ यार्डचे बबलू शेख मोहिउद्दीन यांना पुरस्कार देण्यात आले.

अनिलकुमार लाहोटी, संबोधित करताना म्हणाले की, सुरक्षित काम करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये २४ तास सतर्कता त्यांना प्रेरित करेल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करतील.

यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय आणि प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक सिंह आणि मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख, इतर प्रमुख उपस्थित होते. सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात सामील झाले.