शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:42 IST

जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु

विकास पाटीलआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये फैजपूरला मिळाला होता. तेथून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली. त्यात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते सहभागी झाले. देशाला वाचवायचे असले तर भाजपाला हद्दपार करा, देशाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. केंद्र व राज्यातील सरकार हे असंवेदशील आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्णातील आठ तालुक्यांमधून निघाली. पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्णातून नाशिक जिल्ह्णाकडे रवाना झाली.ही यात्रा जिल्ह्णातून रवाना होत नाही तोच भाजपानेही जळगावात जिल्हास्तरीय मेळावा घेतला. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पक्षाचेखासदार, आमदार उपस्थित होते. भाजपाची जिल्ह्णात ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेसचा सफाया होईल व शिवसेनेचा एकही आमदार निवडणूक येणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पत्रपरिषद घेवून जोरदार आक्षेप घेतला. महाजनांचा हा विश्वास जनतेच्या बळावर नव्हे तर इव्हीएम मशीनमध्ये करण्यात येत असलेल्या सेटींगवर असल्याचा आरोप केला.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा, भाजपाची जिल्हा बैठक व आता गेल्या तीन दिवसांपासून राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्णात मुक्कामी आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा या सात तालुक्यांचा त्यांनी दौरा केला. त्यात त्यांचा ‘फोकस’ युवक, युवती, महिला तसेच डॉक्टर्स, वकील, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मंडळींकडेअसल्याचेदिसूनआले.त्यांनीत्यांच्याशीसंवादसाधला. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आगामी काळात या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्टÑवादीला साथ द्या असे आवाहन करीत पक्षाचा प्रचार केला.जळगाव जिल्ह्णात पक्षाचा एकमेव आमदार असताना खासदार सुळे यांनी तब्बल चार दिवस दिले. पहिल्यांदाच राज्यस्तरावरील एका नेत्याने जळगावात चार दिवस मुक्काम केला असावा. एवढी मेहनत तर मनपा निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेसने घेतली नाही.सुळे यांच्या दौºयापूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर येवून गेले. त्यांनी तब्बल आठ तास जळगावकरांना दिले. जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुन्हा १०० कोटी देणार. समांतर रस्ते, गाळेप्रश्न, हुडको कर्ज आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच म ार्गी लावणार, शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे हे रखडलेले प्रकल्पही वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवून जिल्हावासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडूनही मेहनत घेतली जात आहे. मतदार हुशार आहे. कुणी कितीही आश्वासने दिली तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्यांनीही काय ‘दिवे’ लावले, हेही मतदारांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे मेळावे, बैठका, यात्रा, पत्रपरिषदांद्वारा जनतेचे चांगले मनोरंजन होत आहे, हे मात्र नक्की.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव