शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:42 IST

जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु

विकास पाटीलआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये फैजपूरला मिळाला होता. तेथून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली. त्यात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते सहभागी झाले. देशाला वाचवायचे असले तर भाजपाला हद्दपार करा, देशाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. केंद्र व राज्यातील सरकार हे असंवेदशील आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्णातील आठ तालुक्यांमधून निघाली. पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्णातून नाशिक जिल्ह्णाकडे रवाना झाली.ही यात्रा जिल्ह्णातून रवाना होत नाही तोच भाजपानेही जळगावात जिल्हास्तरीय मेळावा घेतला. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पक्षाचेखासदार, आमदार उपस्थित होते. भाजपाची जिल्ह्णात ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेसचा सफाया होईल व शिवसेनेचा एकही आमदार निवडणूक येणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पत्रपरिषद घेवून जोरदार आक्षेप घेतला. महाजनांचा हा विश्वास जनतेच्या बळावर नव्हे तर इव्हीएम मशीनमध्ये करण्यात येत असलेल्या सेटींगवर असल्याचा आरोप केला.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा, भाजपाची जिल्हा बैठक व आता गेल्या तीन दिवसांपासून राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्णात मुक्कामी आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा या सात तालुक्यांचा त्यांनी दौरा केला. त्यात त्यांचा ‘फोकस’ युवक, युवती, महिला तसेच डॉक्टर्स, वकील, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मंडळींकडेअसल्याचेदिसूनआले.त्यांनीत्यांच्याशीसंवादसाधला. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आगामी काळात या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्टÑवादीला साथ द्या असे आवाहन करीत पक्षाचा प्रचार केला.जळगाव जिल्ह्णात पक्षाचा एकमेव आमदार असताना खासदार सुळे यांनी तब्बल चार दिवस दिले. पहिल्यांदाच राज्यस्तरावरील एका नेत्याने जळगावात चार दिवस मुक्काम केला असावा. एवढी मेहनत तर मनपा निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेसने घेतली नाही.सुळे यांच्या दौºयापूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर येवून गेले. त्यांनी तब्बल आठ तास जळगावकरांना दिले. जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुन्हा १०० कोटी देणार. समांतर रस्ते, गाळेप्रश्न, हुडको कर्ज आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच म ार्गी लावणार, शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे हे रखडलेले प्रकल्पही वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवून जिल्हावासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडूनही मेहनत घेतली जात आहे. मतदार हुशार आहे. कुणी कितीही आश्वासने दिली तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्यांनीही काय ‘दिवे’ लावले, हेही मतदारांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे मेळावे, बैठका, यात्रा, पत्रपरिषदांद्वारा जनतेचे चांगले मनोरंजन होत आहे, हे मात्र नक्की.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव