शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:42 IST

जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु

विकास पाटीलआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये फैजपूरला मिळाला होता. तेथून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली. त्यात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते सहभागी झाले. देशाला वाचवायचे असले तर भाजपाला हद्दपार करा, देशाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. केंद्र व राज्यातील सरकार हे असंवेदशील आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्णातील आठ तालुक्यांमधून निघाली. पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्णातून नाशिक जिल्ह्णाकडे रवाना झाली.ही यात्रा जिल्ह्णातून रवाना होत नाही तोच भाजपानेही जळगावात जिल्हास्तरीय मेळावा घेतला. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पक्षाचेखासदार, आमदार उपस्थित होते. भाजपाची जिल्ह्णात ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेसचा सफाया होईल व शिवसेनेचा एकही आमदार निवडणूक येणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पत्रपरिषद घेवून जोरदार आक्षेप घेतला. महाजनांचा हा विश्वास जनतेच्या बळावर नव्हे तर इव्हीएम मशीनमध्ये करण्यात येत असलेल्या सेटींगवर असल्याचा आरोप केला.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा, भाजपाची जिल्हा बैठक व आता गेल्या तीन दिवसांपासून राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्णात मुक्कामी आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा या सात तालुक्यांचा त्यांनी दौरा केला. त्यात त्यांचा ‘फोकस’ युवक, युवती, महिला तसेच डॉक्टर्स, वकील, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मंडळींकडेअसल्याचेदिसूनआले.त्यांनीत्यांच्याशीसंवादसाधला. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आगामी काळात या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्टÑवादीला साथ द्या असे आवाहन करीत पक्षाचा प्रचार केला.जळगाव जिल्ह्णात पक्षाचा एकमेव आमदार असताना खासदार सुळे यांनी तब्बल चार दिवस दिले. पहिल्यांदाच राज्यस्तरावरील एका नेत्याने जळगावात चार दिवस मुक्काम केला असावा. एवढी मेहनत तर मनपा निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेसने घेतली नाही.सुळे यांच्या दौºयापूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर येवून गेले. त्यांनी तब्बल आठ तास जळगावकरांना दिले. जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुन्हा १०० कोटी देणार. समांतर रस्ते, गाळेप्रश्न, हुडको कर्ज आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच म ार्गी लावणार, शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे हे रखडलेले प्रकल्पही वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवून जिल्हावासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडूनही मेहनत घेतली जात आहे. मतदार हुशार आहे. कुणी कितीही आश्वासने दिली तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्यांनीही काय ‘दिवे’ लावले, हेही मतदारांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे मेळावे, बैठका, यात्रा, पत्रपरिषदांद्वारा जनतेचे चांगले मनोरंजन होत आहे, हे मात्र नक्की.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव