शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:42 IST

जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु

विकास पाटीलआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच मतदारांना जागृत करण्यासाठी जळगाव जिल्ह्णात बैठका, मेळावे, यात्रांचा धडाका सुरु केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ग्रामीण भागात होण्याचा मान स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये फैजपूरला मिळाला होता. तेथून काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली. त्यात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते सहभागी झाले. देशाला वाचवायचे असले तर भाजपाला हद्दपार करा, देशाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. केंद्र व राज्यातील सरकार हे असंवेदशील आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ही जनसंघर्ष यात्रा जळगाव जिल्ह्णातील आठ तालुक्यांमधून निघाली. पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्णातून नाशिक जिल्ह्णाकडे रवाना झाली.ही यात्रा जिल्ह्णातून रवाना होत नाही तोच भाजपानेही जळगावात जिल्हास्तरीय मेळावा घेतला. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पक्षाचेखासदार, आमदार उपस्थित होते. भाजपाची जिल्ह्णात ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी व काँग्रेसचा सफाया होईल व शिवसेनेचा एकही आमदार निवडणूक येणार नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पत्रपरिषद घेवून जोरदार आक्षेप घेतला. महाजनांचा हा विश्वास जनतेच्या बळावर नव्हे तर इव्हीएम मशीनमध्ये करण्यात येत असलेल्या सेटींगवर असल्याचा आरोप केला.काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा, भाजपाची जिल्हा बैठक व आता गेल्या तीन दिवसांपासून राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्ह्णात मुक्कामी आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा या सात तालुक्यांचा त्यांनी दौरा केला. त्यात त्यांचा ‘फोकस’ युवक, युवती, महिला तसेच डॉक्टर्स, वकील, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मंडळींकडेअसल्याचेदिसूनआले.त्यांनीत्यांच्याशीसंवादसाधला. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आगामी काळात या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्टÑवादीला साथ द्या असे आवाहन करीत पक्षाचा प्रचार केला.जळगाव जिल्ह्णात पक्षाचा एकमेव आमदार असताना खासदार सुळे यांनी तब्बल चार दिवस दिले. पहिल्यांदाच राज्यस्तरावरील एका नेत्याने जळगावात चार दिवस मुक्काम केला असावा. एवढी मेहनत तर मनपा निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेसने घेतली नाही.सुळे यांच्या दौºयापूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर येवून गेले. त्यांनी तब्बल आठ तास जळगावकरांना दिले. जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुन्हा १०० कोटी देणार. समांतर रस्ते, गाळेप्रश्न, हुडको कर्ज आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच म ार्गी लावणार, शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे हे रखडलेले प्रकल्पही वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवून जिल्हावासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडूनही मेहनत घेतली जात आहे. मतदार हुशार आहे. कुणी कितीही आश्वासने दिली तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्यांनीही काय ‘दिवे’ लावले, हेही मतदारांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे मेळावे, बैठका, यात्रा, पत्रपरिषदांद्वारा जनतेचे चांगले मनोरंजन होत आहे, हे मात्र नक्की.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव