शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:39 IST

चौपदरीकरण कामात जमिनी गेलेल्या ५२ शेतकऱ्यांना अजूनही मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : आशिया महामार्ग क्रमांक ४६च्या चौपदरीकरण कामात जमिनी गेलेल्या ५२ शेतकऱ्यांना अजूनही मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले. या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर चौपदरीकरणाचे काम पुढे सुरू झाले.

दिनांक १० रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषी कार्यालयापासून वळण घेत नव्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान पारोळा शहरातील ५२ शेतकऱ्यांची शेतजमीन महामार्ग विभागाने भूसंपादित केली आहे. यात शेतकऱ्यांना मोबदल्याची मंजूर रक्कम मिळाली नाही आणि जी रक्कम दिली, ती देताना या भागातील शेतकऱ्यांवर दराच्या बाबतीत अन्याय झाला असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग आम्हाला भूसंपादनाचा मंजूर पैसा मिळावा, अशी मागणी करीत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना उर्वरित भूसंपादनाचा मोबदला देण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.आम्हाला मंजूर मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत या शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. शेतकरी कुटुंबासह चौपदरीकरणाचे काम ज्या ठिकाणी चालू होते, त्या ठिकाणी येऊन मशिनरीसमोर माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पडल्याचे समजताच तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महामार्ग विभागाचे शक्ती सिंग, देवेंद्र मिश्रा आदी नियंत्रण पथक व सर्व लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले.

तहसीलदार अनिल गवांदे यांनी घटनास्थळी येत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी मोबाइलवरून वार्तालाप केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या अपिलावर चर्चा होऊन ते मान्य करीत त्यांना मंजूर मोबदला देण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. तहसीलदार अनिल गवांदे यांनी १५ ते २० दिवसांत भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मंजूर मोबदला मिळणार आहे, असे सांगितले; पण यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या खात्यावर मोबदल्याचे पैसे जमा होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवा, अशी मागणी केली; पण चालू काम बंद ठेवता येणार नाही, असे ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगितले; पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने मग सर्व शेतकऱ्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून महिला-पुरुष अशा सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

यावेळी शेतकरी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, दिलीप वाणी, ज्ञानेश्वर पाटील, उमेश पाटील, संदेश वाणी, सुनील शहा, अशोक पाटील, नाना पाटील, संजय पाटील या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागूल, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, नाना पवार, सुनील पवार यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची दिशा ठरणार, तोपर्यंत काम बंदपारोळा शहरा लगत तालुका कृषी कार्यलया जवळ वळणावर आशिया महामार्ग ४६ चे महामार्ग चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या महामार्ग मध्ये शहरातील ५२ शेतकऱ्यांची शेती संपादित करण्यात आली आहे.परन्तु शेतीचा मंजूर मोबदला या शेतकऱ्यांना न मिळाल्याने त्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. पोलिसांनी त्या सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रमुख गोविंद शिरोळे यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अमळनेर उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार अनिल गवांदे व राष्ट्रीय महामार्ग विभागाची टीम आली होती. या चर्चेतून दुपारी ३ वाजेपर्यंत तोडगा निघाला नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस जिल्हा अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे आले असता आंदोलनकर्ते व पोलीस अधीक्षक यांच्यात चर्चा झाली. त्यांच्या सांगण्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व आंदोलनकर्त्यांनी उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन निर्णय होईल, तो निर्णय होईपर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद ठेवावे, असे सांगितले शेतकऱ्यांची शेती गेली आहे, मागणी योग्य आहे पण पद्धत चुकीची आहे. कायदा हातात घेऊ नका. योग्य पद्धतीने कामे करा. योग्य पद्धतीने कार्यालयीन पाठपुरावा करून काम बंद करा, पद्धत चुकीची असल्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागते, असे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हेही उपस्थित होते

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाhighwayमहामार्गFarmer strikeशेतकरी संप