शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित केळी पीक विम्याच्या रकमेअभावी शेतकरी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

जून २०२० मध्ये वादळी पावसातील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या केळी नुकसानीचा हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १,८७१ शेतकऱ्यांच्या ...

जून २०२० मध्ये वादळी पावसातील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या केळी नुकसानीचा हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १,८७१ शेतकऱ्यांच्या संरक्षित विम्याची ८.७१ कोटी रुपयांची रक्कम तब्बल नऊ महिन्यांच्या विलंबानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने बँकेत वर्ग केली आहे. विमा कंपनीने तब्बल नऊ महिन्यांचा विलंब केल्याची बाब प्रथमदर्शनी दिसत असली तरी, तालुक्यातील काही बँक शाखा व्यवस्थापनाने वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र, संबंधित विमा हप्त्याची रक्कम व देय संरक्षित विम्याच्या रकमा अशी अत्यावश्यक माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर भरताना महसूल भाग मंडळाचे क्षेत्र चुकीचे भरल्याने, कुणाचा हप्त्याची रक्कम वा बाधित क्षेत्र चुकीची भरल्याने तथा शेतकऱ्यांच्या आधारकार्डाचे विवरण चुकीचे भरले. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचे संरक्षित विम्याच्या देय रकमेची माहिती भरकटल्याने शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला होता.

तत्संबंधीची बाब जिल्हा कृषी विभागाने ध्यानात आणल्याने विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल मंडळ, नुकसानग्रस्त क्षेत्र, विमा हप्ता आदी विवरण चुकीचे भरणाऱ्या संबंधित बँक व्यवस्थापनाने ५ कोटी रुपयांचा दंड संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केला आहे.

दरम्यान, काही केळी उत्पादक शेतकऱ्यांचे विमा हप्ते बँक व्यवस्थापनाने कपात केले असले तरी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे संबंधित विमा कंपनीकडे सादर झाले नसल्याचा घोळ उघड झाला आहे. परिणामी संबंधित शेतकरी संरक्षित विम्याच्या रकमेपासून वंचित आहे. आधारकार्डाचे विवरणाच्या चुकीसंदर्भात दोष स्वीकारण्याबाबत विमा कंपनी व बँक व्यवस्थापन परस्परविरोधी अंगुलीनिर्देश करीत असले तरी शेतकऱ्यांच्या संरक्षित विम्याची रक्कम विनाविलंब अदा करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

नुकसानीचा पंचनामा संयुक्त करावा

वेगवान वाऱ्यांमुळे होणाऱ्या केळी नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी विमा कंपन्या खादगी प्रणालीतून पंचनामे करीत असल्याने मोठा घोळ निर्माण होत असल्याची गंभीर बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शासनाची महसूल व कृषी विभागाची संयुक्त प्रणालीद्वारे होत असलेल्या पंचनामे व विमा कंपनीच्या पंचनाम्यांमध्ये विसंगती होत असल्याने शासनाने विमा कंपन्यांना शासकीय पंचनामे बंधनकारक करावेत. अन्यथा शासनप्रणालीच्या समक्षच विमा कंपनीने पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. परिणामी शेतात केळीचे खोड लावले नसताना केवळ बँकांनी कर्ज वितरणात केळी नसतानाही केळी फळपीक विम्याचा हप्ता कपात केला म्हणजे, शेतात केळीबागा अस्तित्वात नसताना संरक्षित विम्याच्या लाखो रुपयांच्या रकमा जमा होण्याचा सावळा गोंधळ थांबेल, असे स्पष्ट मत काही काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेतील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचा संरक्षित विमा अदा करण्यासाठी विमा कंपनीच्या पोर्टलवर चुकीची माहिती सादर झाल्याने तथा चुकीचे महसूल मंडळ निर्देशित केल्याने व आधारकार्डाचे विवरण चुकीचे सादर केल्याने तालुक्यातील ४० ते ५० शेतकरी लाभापासून वंचित आहेत. बँक व्यवस्थापनाच्या या चुकीमुळे तब्बल पाच कोटी रुपये दंडाची रक्कम बँकांनी अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने पारित केले आहेत. आधारकार्ड विवरणातील त्रुटींची जबाबदारी स्वीकारण्याबाबत बँक व्यवस्थापन व विमा कंपनी परस्परविरोधी दोष दर्शवत असले तरी लवकरच निपटारा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- एम. जी. भामरे, तालुका कृषी अधिकारी, रावेर