शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नशिराबाद आणि परिसरात ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:16 PM

शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी : सरसकट भरपाई द्या

नशिराबाद : अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील सुमारे ७५० हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. यंदा पावसामुळे धान्य ,चारा, याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा भरपूर पाऊस झाला. ऐन पिके काढण्याच्या तोंडावरच पावसाने संततधार चा धडाका सुरू केला. त्यामुळे शेतात उभी असलेली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात मका, ज्वारी कणसाला कोंबच फूटले, सोयाबीन खराब झाला, तर कापूस सडला. अजूनही काही शेतात पाणीच पाणी साचलेय अशा स्थितीने शेतकरी राजा बेजार झाला आहे. नशिराबाद सह परिसरात सोयाबीनचे ३०० हेक्टर, कापसाचे २५०हेक्टर, ज्वारी,मक्याचे २०० हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.रब्बीची तयारी करावी कशी?शासन उभी पिकांची पंचनामे करत असल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयारी करण्यास व्यत्यय येत आहे. पंचनामे करणाºया अधिकारी येतील तो पर्यंत ती बाधीत पिके काढता येत नसल्याने शेतकरी त्यांची वाट पाहत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी लागणार आह, त्यासाठी पिक पेरानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.दिवाळी पावसाची अन नासाडी पिकांची..देवा पुरे झाला आता पाऊस ..अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली. मात्र वरुणराजाने पाण्याचा वर्षाव करीत दिवाळी केली. मात्र शेतकरी राजाचे कंबरडे मोडीत सर्वच पिकांची नासाडी केली. हातातल्या हंगाम गेला. यंदा ओला दुष्काळाने मारले मात्र शासन तरी तारेल काय? या प्रतीक्षा आहे.पंचनामे सुरूनशिराबाद येथे तलाठी प्रवीण बेंडाळे, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, ग्रामविकासअधिकारी बी.एस. पाटील, व सहकारी पंचनामे करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव