शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास मुंबईचे दररोज ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

जळगाव : विमानाच्या तांत्रिक कारणामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली विमानेसवा, १४ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, सध्या आठवड्यातून ...

जळगाव : विमानाच्या तांत्रिक कारणामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली विमानेसवा, १४ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, सध्या आठवड्यातून तीनच दिवस ही सेवा सुरू राहणार असून, जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर १ ऑगस्टपासून मुंबईची विमानसेवा दररोज सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती विमान कंपनीचे व्यवस्थापक अखिलेश सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मुंबई दरम्यान विमानसेवा देण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विमान कंपन्यांच्या मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर निर्बंध लादल्यामुळे, विमान कंपनीतर्फे आठवड्यातून बुधवार, शनिवार व रविवारीच ही सेवा सुरू होती. तर आता राज्य शासनाने हे निर्बंध उठविले असले तरी, १४ जुलैपासून सुरू होणारी विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. दरम्यान, बुधवारपासून सुरू होणाऱ्या मुंबईच्या सेवेची तिकीट विक्री सोमवारी सायंकाळपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली असून, या प्रवाशांना थेट विमानतळावरून तिकीट खिडकीवरूनही तिकीट खरेदी करता येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने मुंबई विमानतळावरील निर्बंध उठविले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विमान कंपन्यांच्या मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर निर्बंध लादले होते. हे निर्बंध शासनाने नुकतेच उठविले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना पूर्ण क्षमतेने विमानसेवा चालविता येणार असून, त्यानुसार जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीतर्फेही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास नियमित ही सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.