शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विहिरींची चोरी करून केले बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST

नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही ...

नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही बांधकामे वाढत जात असताना, अनेक ठिकाणी पर्यावरणाचा कोणताही विचार होताना दिसून येत नसून, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम करण्याचे कामदेखील घडत आहे. शहरातील सुमारे २० हून अधिक विहिरी गायब करून, त्याठिकाणी बांधकाम करण्याचे प्रकारदेखील शहरात घडत आहेत; मात्र याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

शहरातील वाढीव भागात हे प्रकार अधिक घडत आहेत. मेहरुण, सावखेडा शिवार, निमखेडी, खेडी या भागासह शिवाजी नगर व जुने जळगाव गाव परिसरातील अनेक भागांमध्ये जुन्या विहिरी बंद करून त्याठिकाणी बांधकाम करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे खासगी विहिरींसोबत ज्या विहिरींवरून कधीकाळी संपूर्ण परिसरासाठी पुरवठा केला जात होता. त्या विहिरीदेखील गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या भागांमध्ये घडले प्रकार

१. शहरातील शिवाजीनगर भागातदेखील एका रस्त्यालगत असलेली विहीर बंद करून, त्यावर बांधकाम केले होते. दऱम्यान, या विहिरीचा पाण्याचा वापर सार्वजनिक पुरवठ्यासाठी होत होता; मात्र खासगी जागेत असल्याचे कारण देत ही विहीर बंद करून, याठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे.

२. आव्हाणे शिवार परिसरातदेखील दोन विहिरी बंद करून, त्याठिकाणी मोठे अपार्टमेंट बांधण्यात आले आहेत; मात्र या विहिरीवर बांधकाम करताना मनपाचीदेखील कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

३. यासह सावखेडा शिवार असो वा निमखेडी परिसर, या भागातदेखील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगतच्या विहिरीवरदेखील अतिक्रमण करून विहिरी बंद केल्या आहेत.

नाल्याचा प्रवाह बदलविला

शहरातील लेंडी नाल्याचा मुख्य नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ममुराबादकडे जाणाऱ्या नैसर्गिक प्रवाहावर भर टाकून हा प्रवाह बदलविण्यात आला आहे. भविष्यात अतिवृष्टी झाल्यास यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोट..

विहिरींवर बांधकामाबाबत तक्रारी आलेल्या नाहीत; मात्र जर अशा प्रकारचे बांधकाम होत असेल तर याबाबतचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासह नाल्याच्या प्रवाहाबाबतदेखील माहिती घेऊन याबाबत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

-संतोष वाहुळे, उपायुक्त.

प्रशासनाचे दुर्लक्ष अन् राजकारण

पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत राजकारणी व प्रशासनदेखील गांभिर्याने विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर ग्रीन झोन असताना त्याठिकाणी बांधकामांना परवानगी दिली जात आहे. नाल्याचा प्रवाह बदलविण्यात आला, तरीही यावर कारवाई नाही. हा प्रकार चुकीचा आहे.

-प्रणिलसिंह चौधरी, संचालक, योगी फाउंडेशन.

अनेक विहिरी या पाण्याचा नैसर्गिक स्रोत उत्पन्न करून देत असतात; मात्र या प्रकारे बांधकाम करताना दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नाल्याचा प्रवाह बदलविल्यामुळेदेखील पुराचे संकट निर्माण होऊ शकते.

- सागर महाजन, संचालक, नीर फाउंडेशन.