शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात संधी शोधून ‘शवदाहिनी’चा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही ...

जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही संधी शोधली पाहिजे. संकटाला संधी शोधून नेरी नाका स्मशानभूमीत जे शवदाहिनी बसविण्याचे काम झाले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शवदाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा नेरी नाका वैकुंठधामात उभारण्यात आलेल्या शवदाहिनीचे उद्घाटन रविवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात झाले. यावेळी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, वैकुंठ शवदाहिनी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शववाहिनी उभारण्याकरिता ज्यांनी मोठी आर्थिक मदत करणाऱ्या उद्योजक रिखबराज बाफनांसह दिलीप चोपडा, हरीश तोलानी यांचा सत्कार करण्यात आला.

इन्फो: दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात शवदाहिनी -भरत अमळकर

भरत अमळकर यांनी रिखबराज बाफना यांनी जळगावातही शवदाहिनी बसविण्याबाबत कल्पना मांडली आणि मोठी आर्थिक मदत केली. बाफनांसह इतर दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शवदाहिनी कार्यान्वित करण्यात येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन मनीषा खडके यांनी तर आभार नंदू आडवानी यांनी मानले.

इन्फो :

आमदार भोळेंनी स्वीकारली १०० लोकांच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी

आमदार सुरेश भोळे यांनी निराधार, बेवारस व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या एका वर्षात १०० लोकांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. तसेच समाजात अनेक गरीब कुटुंबाकडे अंत्यसंस्काराचे साहित्य घेण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळे जे बीपीएल रेशन कार्डधारक नागरिक आहेत, त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्याबाबतही मत व्यक्त केले.

इन्फो :

जळगाव ऐपत आणि दानत असणारेही लोक आढळले : आयुक्त

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, लोकसहभागाशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नसल्याचे सांगितले. तसेच आपण अनेक शहरात काम केले. परंतु, ‘ऐपत’ अनेकांकडे असते. मात्र, देण्याची ‘दानत’ किती जणांकडे असते, हे माहीत नाही. मात्र, जळगावात ऐपत आणि दानत असणारे आणि दातृत्व असणारे लोक आढळले असल्याचे मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.