शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक....आता कोरोना संसर्गाचा उतरता आलेख सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण बरेदेखील होत आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून पॉझिटिव्हिटी दरही कमी झाला असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. असे असले तरी प्रशासनाच्यावतीने सर्व उपाययोजना सुरूच राहणार असून पॉझिटिव्हिटी दर एक अंकी येईपर्यंत सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.ए. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार उपस्थित होते.

आठ ते १० दिवसात रुग्णसंख्या घटणार

कोरोनाच्या या लाटेत उच्चांकी गाठली असून आता रुग्णवाढीचा आलेख वर जाण्यापेक्षा खाली येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोना लाटेची तीव्रता व करण्यात येत असलेल्या उपाययोजना यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिरावली आहे. यात चोपडा येथे रुग्णांची संख्या पाहता आता नियंत्रण मिळविले जात असून केवळ भुसावळ, जळगावातील काही भाग, एरंडोल, जामनेर येथे नियंत्रण आवश्यक असून तेथेदेखील लवकरच रुग्णसंख्या कमी होईल व येत्या आठ ते १० दिवसात जिल्ह्यातील नवीन रुग्णसंख्या व ॲक्टिव्ह रुग्णही कमी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. यात ४ एप्रिलची संख्या पाहता ५ रोजी ती ३० ने कमी झाली. त्यानंतर मध्यंतरी स्थिरावली व आता पुन्हा कमी झाली असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजारावरून १० हजार ५८९वर आली आहे.

वेळेवर उपचार घेतल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज नाही

जिल्ह्यात अजूनही अनेक जण वेळेवर तपासणी करीत नाहीत. त्यामुळे प्रकृती खालावून रुग्णसंख्या व त्यातही गंभीरतेचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर तपासणी केल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज पडणार नाही, त्यामुळे सर्वांनी लक्षणे जाणवताच तपासणी करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.

लस दाखल, तीन दिवसात लसीकरण पूर्ण करा

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस संपली होती. त्यामुळे लसीकरण थांबले होते. आता जिल्ह्यासाठी ४० हजार ९०० युनिट मिळाले असून जिल्ह्यातील १३३ केंद्रांवर लसीकरणाला मंगळवारीच सुरूवात झाली. या उपलब्ध लसींद्वारे तीन दिवसात लसीकरण पूर्ण करायचे असून तशा सूचना देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

नवीन वर्षात आरोग्याची गुढी

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बरे होणारे व नवीन रुग्ण संख्या बरोबरीत असून काही दिवस बरे होणारे जास्त असल्याचे आढळून आले. आता समतोल परिस्थिती आली असून रुग्णवाढीचा आलेख आता उतरता झाला आहे. गुढीपाडव्याला ही सकारात्मक बाब असून आरोग्याची गुढी उभारू व जिल्हावासीयांना पुढील वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

अमळनेरला रेमडेसिविरचा अनावश्यक वापर

जिल्ह्यात दोन हजार रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्यास मागणी पाच हजार इंजेक्शनची होते, असे चित्र असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. यात ज्यांना आवश्यकता नाही त्यांनाही ते दिले जात असून अशाच प्रकारे स्कोअर तीन असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिले गेल्याचे अमळनेर येथे आढळून आल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.