शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 15:55 IST

गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा६० टक्के उत्पन्नाला फटकाबाजार समितीतही ५० लाखांचे नुकसानबाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'पंचनामे तातडीने करा

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात असल्याने अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. बाजार समितीतही मका व अन्य शेतमालाचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गेली तीन वर्ष चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ मुक्कामी असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आहे. यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला अभूतपूर्व पाणीटंचाई उदभवल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचे प्रचंड हाल झाले. पाणीटंचाईमुळे नागरिकदेखील हतबल झाले होते. सुरुवातीला पावसाने ओढ घेतली. मात्र उत्तरार्धात त्याची हजेरी नियमित झाल्याने यंदा चांगले उत्पन्न येण्याच्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाचा अवकाळी मारा सुरू असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासच हिरावल्यासारखी स्थिती असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.धान्य पिकांचे नुकसानचाळीसगाव तालुक्यात कपाशी पेºया खालोखाल धान्य पिकांची लागवड होते. यामुळे बाजरी, ज्वारी व कडधान्ये पिकांची कापणी करण्यात आली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली पूर्णपणे भिजून वाया गेली आहे. ज्वारीच्या कणसांना पुन्हा कोंब फुटले आहेत. ज्वारी काळपट होईल, असे शेतकºयांनी सांगितले.काही ठिकाणी कांदा पिकाचीही लागवड करण्यात आली. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. चढ्या दराने खरेदी केलेली रोपे कुजू लागली आहे. यात शेतकºयांना फटका बसला आहे.मे व जूनमध्ये लागवड केलेले कपाशी पीक वेचणीला आले असताना ते पावसाच्या खिंडीत सापडले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.बाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'बाजार समितीत गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाºयांनी खरेदी केलेला मका बाजार समितीतच पडून आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचे धूमशान सुरू असल्याने तीन हजार क्विंटल मका पूर्णपणे भिजला आहे. मंगळवारी मका सुकवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सायंकाळी आलेल्या पावसाने तो पुन्हा भिजला. भिजल्याने मक्याला कोंब फुटले आहेत. व्यापाºयांचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.पंचनामे तातडीने कराअवकाळी पावसाने यावर्षी शेतकºयांचे कंबरडे मोडले असून तो कोलमडून पडला आहे. धान्य, कडधान्य, कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतमाल भिजल्याने कुजू लागला आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.- दिनेश पाटीलतालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, चाळीसगाव

टॅग्स :RainपाऊसChalisgaonचाळीसगाव