शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी : कैद्यांची साक्ष आता व्हीसीद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:12 IST

न्यायालयाच्या वेळेतही बदल

जळगाव : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून न्यायालयाच्या कामकाजात मंगळवारपासून बदल करण्यात आला आहे. तसेच कैद्यांची साक्षही कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) सुरु करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. कार्यालयीत कर्मचाऱ्यांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी मंगळवारी आदेश काढले.या आदेशानुसार मंगळवारी फक्त सकाळसत्रातच कामकाज झाले. तालुका न्यायालयांसाठीही हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे. न्यायायलयीन कर्मचारी, अधिकारी व वकील यांनी देखील खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल व मास्क लावूनच कामकाज सुरु केले आहे. मंगळवारी ६० टक्के वकीलांनी तोंडाला रुमाल लावून कामकाज केले. कर्मचारी देखील हीच काळजी घेत आहे. भीती नाही, परंतु काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. वारंवार साबणाने हात धुणे, हस्तांदोलन टाळणे, किमान दोन मीटर अंतरावरुन संवाद साधणे ही काळजी घेतली जात असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ जळमकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.रुमाल व मास्कला परवानगीकारागृहात दाखल असलेल्या कैद्याला नातेवाईकांनी रुमाल व मास्क आणून दिला तर ते देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रोज जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर येत आहेत. आवश्यक असेल तरच डॉक्टर कैद्याला रुग्णालयात हलविण्याच्या सूचना देतात. त्या वेळी पोलिसांच्या माध्यमातून कैद्याला रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, कैदी पार्टी पोलिसांनाही सॅनेटरायझर व साबण पुरविण्यात येत आहे.कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच खबरदारीकारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व खबरदारीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक आशिष गोसावी यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर, साबण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक असोत किंवा गुन्ह्यातील आरोपींना कारागृहात दाखल करायला येणारे पोलीस व आरोपी यांना बाहेरच हात स्वच्छ धुवून व तोंडाला रुमाल लावून प्रवेश दिला जात आहे. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना देखील तोंडाला रुमाल व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अति महत्त्वाचे जबाब व दोषारोपाचेच आरोपी न्यायालयातन्यायालयात खटला सुरु असलेल्या अति महत्वाच्या प्रकरणात ज्या कैद्याचा जबाब नोंदवायचा आहे किंवा दोषारोप ठेवायचा आहे, अशाच कैद्याला कारागृहातून न्यायालयात आणले जात आहे. अन्यथा सर्वच कैद्यांची साक्ष व इतर कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच घेतले जात आहे. प्रथमवर्ग व सत्र न्यायालय दोन्ही ठिकाणी हे कामकाज अशाच प्रकारे केले जात असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिली. तालुकास्तरावरील न्यायालयातही याच पध्दतीने कामकाज केले जात असून तेथीलही वेळेत बदल करण्यात आला आहे.अपर महासंचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही सूचना दिल्या आहेत. अपवाद वगळता न्यायालयीन कामकाज व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे केले जात आहे. कैदी, त्यांना भेटायला येणारे नातेवाईक व कर्मचाºयांसाठी प्रवेशद्वारावरच साबण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे आल्यानंतर २० सेकंदात हात स्वच्छ धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -आशिष गोसावी, कारागृह अधीक्षककोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आरोपींची साक्ष देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जात आहे. महत्वाचे व तात्काळ कामकाजातच आरोपींना न्यायालयात आणले जात आहे. तेव्हा देखील आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Jalgaonजळगाव