शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:34 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांच्या तयारीला सुरुवात, दुष्काळ, पाणीटंचाईपासून तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या, अभिमानाच्या विषयांसंदर्भात इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत खान्देशातील चारही मतदारसंघात उमेदवारीवरुन मोठी उलथापालथ झाली. विधानसभेच्यादृष्टीने ही रंगीत तालीम होती. सगळ्याच राजकीय पक्षांमधील हा गोंधळ पहाता इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींची खबरबात ठेवत असताना जनतेपुढे आपण सतत कसे राहू याचा खटाटोप सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. ही निवडणूक रोमांचक ठरेल, असे चित्र आहे.महाराष्टÑाच्या विधानसभेसाठी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साडेतीन महिने आता राजकीय पक्षांच्या हाती उरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युती आणि आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निकाल अपेक्षेप्रमाणे लागले तर आलबेल राहील. दगाफटका, विश्वासघात असे प्रकार घडले तर पुन्हा म्यान केलेल्या तलवारी बाहेर निघतील. एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल. युती आणि आघाडीचा फेरविचार होऊ शकेल. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास गेल्यावेळेसारखा भाजपकडे इच्छुकांचा ओढा असेल. सत्ता न मिळाल्यास काँग्रेस, राष्टÑवादीकडे इच्छुक वळतील.गेल्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. खान्देशात २० जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. पाच जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या तर तीन जागा जिंकत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. राष्टÑवादी कॉंग्रेस आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले होते. स्वबळ प्रत्येकाने अजमावले आहे. त्यानंतर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीत युती-आघाडी करुन हे पक्ष लढले आहेत. कुरबुरी झाल्या तरी युती-आघाडीशिवाय पर्याय नाही, हेदेखील धुरिणांना कळून चुकले आहे.लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन झालेली उलथापालथ लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार हे स्वत:ची प्रतिमानिर्मिती करण्यात मग्न आहेत. स्वयंभू नेते ‘सर्वपक्षसमभाव’बाळगून आहेत. या पक्षाने नाही दिले तर दुसरा...अशा भूमिकेतून प्रयत्न सुरु आहेत. जनतेची स्मरणशक्ती कमकुवत असते हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या सहा महिने आघी कामाचा झपाटा लावण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. विद्यमान आमदारदेखील दुष्काळ, टंचाई याविषयी प्रचंड जागरुक असून प्रशासनाशी जुळवून घेत कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.पाण्याचा टँकर, विहीर गावासाठी खुली करणे, कॉलनीत पाण्याचे जार पोहोचवणे, चौक, उद्यान, किल्ले यांचे सुशोभीकरण, जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण कार्यात सक्रीय सहभाग घेणे अशा माध्यमातून जनतेशी निकटता आणि पुढाकार यासाठी इच्छुकांची धडपड चालली आहे. हे सगळे करीत असताना राजकीय पक्षांमधील नेते, संघटनात्मक पदाधिकारी यांच्याशी संपर्क, संवाद व समन्वय राखला जात आहे. स्वत:विषयी, केलेल्या कामांविषयी ‘फाईल’तयार केली जात आहे. राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहेच. सर्वेक्षण जरी अद्याप सुरु झालेले नसले तरी कानोसा घेतला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून ‘मुंबई’ला जायची सगळ्यांची तयारी आहे.यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण ठरत आहे. मतदानाचे पाच टप्पे आटोपले आणि आता केवळ दोन टप्पे उरले आहेत. विजयाचे दावे सगळे करीत असले तरी ठामपणा त्यात दिसून येत नाही. खान्देशचा विचार केला तर कोणताही उमेदवार विजयाची हमखास खात्री देताना दिसत नाही. विजयाचे गणित जुुळवताना कमी-अधिक मतदान, विविध समाजघटकांचा कल, पक्ष, युती-आघाडीअंतर्गत नाराजी, रुसवे-फुगवे असे घटक परिणामकारक ठरत असतात. गुप्तचरांचे अंदाज, सट्टाबाजाराचा कल, पक्षांतर्गत सर्वेक्षण, आकडेमोड वेगवेगळे निकाल सांगत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव