शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:34 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांच्या तयारीला सुरुवात, दुष्काळ, पाणीटंचाईपासून तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या, अभिमानाच्या विषयांसंदर्भात इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत खान्देशातील चारही मतदारसंघात उमेदवारीवरुन मोठी उलथापालथ झाली. विधानसभेच्यादृष्टीने ही रंगीत तालीम होती. सगळ्याच राजकीय पक्षांमधील हा गोंधळ पहाता इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींची खबरबात ठेवत असताना जनतेपुढे आपण सतत कसे राहू याचा खटाटोप सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. ही निवडणूक रोमांचक ठरेल, असे चित्र आहे.महाराष्टÑाच्या विधानसभेसाठी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साडेतीन महिने आता राजकीय पक्षांच्या हाती उरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युती आणि आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निकाल अपेक्षेप्रमाणे लागले तर आलबेल राहील. दगाफटका, विश्वासघात असे प्रकार घडले तर पुन्हा म्यान केलेल्या तलवारी बाहेर निघतील. एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल. युती आणि आघाडीचा फेरविचार होऊ शकेल. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास गेल्यावेळेसारखा भाजपकडे इच्छुकांचा ओढा असेल. सत्ता न मिळाल्यास काँग्रेस, राष्टÑवादीकडे इच्छुक वळतील.गेल्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. खान्देशात २० जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. पाच जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या तर तीन जागा जिंकत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. राष्टÑवादी कॉंग्रेस आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले होते. स्वबळ प्रत्येकाने अजमावले आहे. त्यानंतर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीत युती-आघाडी करुन हे पक्ष लढले आहेत. कुरबुरी झाल्या तरी युती-आघाडीशिवाय पर्याय नाही, हेदेखील धुरिणांना कळून चुकले आहे.लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन झालेली उलथापालथ लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार हे स्वत:ची प्रतिमानिर्मिती करण्यात मग्न आहेत. स्वयंभू नेते ‘सर्वपक्षसमभाव’बाळगून आहेत. या पक्षाने नाही दिले तर दुसरा...अशा भूमिकेतून प्रयत्न सुरु आहेत. जनतेची स्मरणशक्ती कमकुवत असते हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या सहा महिने आघी कामाचा झपाटा लावण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. विद्यमान आमदारदेखील दुष्काळ, टंचाई याविषयी प्रचंड जागरुक असून प्रशासनाशी जुळवून घेत कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.पाण्याचा टँकर, विहीर गावासाठी खुली करणे, कॉलनीत पाण्याचे जार पोहोचवणे, चौक, उद्यान, किल्ले यांचे सुशोभीकरण, जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण कार्यात सक्रीय सहभाग घेणे अशा माध्यमातून जनतेशी निकटता आणि पुढाकार यासाठी इच्छुकांची धडपड चालली आहे. हे सगळे करीत असताना राजकीय पक्षांमधील नेते, संघटनात्मक पदाधिकारी यांच्याशी संपर्क, संवाद व समन्वय राखला जात आहे. स्वत:विषयी, केलेल्या कामांविषयी ‘फाईल’तयार केली जात आहे. राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहेच. सर्वेक्षण जरी अद्याप सुरु झालेले नसले तरी कानोसा घेतला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून ‘मुंबई’ला जायची सगळ्यांची तयारी आहे.यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण ठरत आहे. मतदानाचे पाच टप्पे आटोपले आणि आता केवळ दोन टप्पे उरले आहेत. विजयाचे दावे सगळे करीत असले तरी ठामपणा त्यात दिसून येत नाही. खान्देशचा विचार केला तर कोणताही उमेदवार विजयाची हमखास खात्री देताना दिसत नाही. विजयाचे गणित जुुळवताना कमी-अधिक मतदान, विविध समाजघटकांचा कल, पक्ष, युती-आघाडीअंतर्गत नाराजी, रुसवे-फुगवे असे घटक परिणामकारक ठरत असतात. गुप्तचरांचे अंदाज, सट्टाबाजाराचा कल, पक्षांतर्गत सर्वेक्षण, आकडेमोड वेगवेगळे निकाल सांगत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव