शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

शेतात दारु पिण्यास बसल्यावरुन कासोद्यात दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 8:15 PM

गुन्हा दाखल : १३ जणांना अटक

कासोदा- माझ्या जागेत दारु पिण्यास का बसले याचा जाब विचारुन रिकाम्या बाटल्या उचलायला लावल्याच्या कारणावरुन येथे .५ च्या रात्री दोन गट एकमेकांना भीडले. मोठा जमाव एका इमारती जवळ गोळा झाल्याने तणाव वाढला होता,मात्र तात्काळ पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला आहे.दोन्ही गटांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल होऊन १३ जणांना अटक करण्यात आली आहे.५ रोजी रात्री तळई रस्त्यावरील शेतात काही जण दारू पीत बसले होते,शेतमालक वाल्मिक देविदास समशेर यांनी त्यांना हटकले व दारुच्या रिकाम्या बाटल्या उचलून फेकावयास लावल्या, आम्ही ज्या बाटल्या पिलो त्याच फेकू,आधीच्या पडलेल्या फेकणार नाही, यावरुन वाद वाढला व वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हा वाद पुन्हा घरी आल्यावर वाढला पण यावेळी समशेर यांच्या इमारतीजवळ मोठा जमाव जमला. इमारतीच्या दरवाजा व खिडक्यांंना दगड मारुन काचा फोडल्या, यावरून गावात अफवा पसरल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वाल्मिक देविदास समशेर यांच्या फियार्दीवरून भादंविक १४३, १४७, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७, १८८,सह जमावबंदीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन इरफान मन्सूफ खान,अजमल मुक्तार खान,सह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इरफान खान मुन्सब खान यांच्या फियार्दीवरून वाल्मिक देविदास समशेर, गणेश बाबूलाल अहिरे सह एकूण ५ जणांना अटक केली आहे. सहाय्यक फौजदार सहदेव घुले व पो.नाईक युवराज कोळी हे पुढील तपास करीत आहेत.या घटनेनंतर चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी घटनास्थळी भेंट देऊन शांतता समितीची तातडीने बैठक घेतली. यावेळी एपीआय रवींद्र जाधव,पीएसआय नरेश ठाकरे, हिंमत पाटील, भैय्या राक्षे,रवींद्र चौधरी मुक्तार पंजाबी,समद कुरेशी सह काही नागरिकांशी संवाद साधला व शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे.पण दारुमुळे जर संपूर्ण गावाची शांतता धोक्यात येत असेल तर संबंधीतांनी जास्त कठोर होणे गरजेचे आहे, अशी चर्चा गावात होत आहे.