शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. विजेची जोडणी नसतानाही शेतकऱ्याला दीड लाखाचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका ...

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका शेतकऱ्याला चक्क दीड लाख रुपयाचे वीज बिल पाठविले आहे. हे वीज बिल पाहून संबंधित शेतकरी बांधवाला चांगलाच धक्का बसला असून, या प्रकारामुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच या बिलानंतर संबंधित शेतकऱ्याने महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही बिलाबाबत न्याय मिळत नसल्यामुळे, हे बिल कसे भरावे, असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला आहे. दिलीप कडू धनगर (रा. रायपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी दिलीप कडू धनगर यांची रायपूर गावाला लागून गट नंबर १०३-१ मध्ये स्वत: च्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी २०१४ साली बोअरवेल केली होती. बोअरवेलचे पाणी उपसण्यासाठी दिलीप धनगर यांनी महावितरणच्या चिंचोली येथील कार्यालयाकडे वीज जोडणी मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. अर्जानंतर वीज पुरवठा मिळण्यासाठी धनगर यांनी २५ मार्च २०१४ रोजी ७ हजार रुपये इतकी डिमांड रक्कमही महावितरणकडे भरली होती. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही महावितरणने धनगर यांना वीज जोडणी दिलेली नाही. विजेची जोडणी मिळण्याबाबत दिलीप धनगर या शेतकऱ्याने अनेकवेळा चिंचोली कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात येत असल्यामुळे धनगर यांनी वीज जोडणी मिळणार नसल्याचे गृहीत धरून महावितरणच्या कार्यालयात जाणेही बंद केले आहे.

इन्फो :

...अन् जोडणी नसतानाही आले दीड लाखाचे बिल

दिलीप धनगर यांनी गेल्या सात वर्षाेत अनेकदा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही, वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात धनगर यांना थेट १ लाख ५४ हजार ९७० रुपयांचे वीज बिल आले आहे. शेतात वीज जोडणी नाही, मीटर नाही, त्यामुळे हे बिल कसे आले, याबाबत दिलीप धनगर यांनी अनेकवेळा महावितरणच्या रायपूरजवळील चिंचोली कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही धनगर यांचे देण्यात आलेल्या बिलाचे कारण सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत चिंचोली येथील महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. राऊत यांच्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इन्फो :

माझ्या शेतात वीज जोडणीसाठी २५ मार्च २०१४ मध्ये डिमांड नोट भरूनही महावितरण प्रशासनाने वीज जोडणी दिलेली नाही. वरून नंबर आल्यावर, वीज जोडणी होणार असल्याचे सात वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, सात वर्षांत विजेची जोडणी नसताना दीड लाखाचे वीजबिल आल्यामुळे मला धक्काच बसला आहे. या बिलाबाबत चिंचोली कार्यालयात अनेकवेळा जाऊनही न्याय मिळालेला नाही.

-दिलीप धनगर, शेतकरी, रायपूर