शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. विजेची जोडणी नसतानाही शेतकऱ्याला दीड लाखाचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका ...

जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका शेतकऱ्याला चक्क दीड लाख रुपयाचे वीज बिल पाठविले आहे. हे वीज बिल पाहून संबंधित शेतकरी बांधवाला चांगलाच धक्का बसला असून, या प्रकारामुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच या बिलानंतर संबंधित शेतकऱ्याने महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही बिलाबाबत न्याय मिळत नसल्यामुळे, हे बिल कसे भरावे, असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला आहे. दिलीप कडू धनगर (रा. रायपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी दिलीप कडू धनगर यांची रायपूर गावाला लागून गट नंबर १०३-१ मध्ये स्वत: च्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी २०१४ साली बोअरवेल केली होती. बोअरवेलचे पाणी उपसण्यासाठी दिलीप धनगर यांनी महावितरणच्या चिंचोली येथील कार्यालयाकडे वीज जोडणी मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. अर्जानंतर वीज पुरवठा मिळण्यासाठी धनगर यांनी २५ मार्च २०१४ रोजी ७ हजार रुपये इतकी डिमांड रक्कमही महावितरणकडे भरली होती. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही महावितरणने धनगर यांना वीज जोडणी दिलेली नाही. विजेची जोडणी मिळण्याबाबत दिलीप धनगर या शेतकऱ्याने अनेकवेळा चिंचोली कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात येत असल्यामुळे धनगर यांनी वीज जोडणी मिळणार नसल्याचे गृहीत धरून महावितरणच्या कार्यालयात जाणेही बंद केले आहे.

इन्फो :

...अन् जोडणी नसतानाही आले दीड लाखाचे बिल

दिलीप धनगर यांनी गेल्या सात वर्षाेत अनेकदा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही, वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात धनगर यांना थेट १ लाख ५४ हजार ९७० रुपयांचे वीज बिल आले आहे. शेतात वीज जोडणी नाही, मीटर नाही, त्यामुळे हे बिल कसे आले, याबाबत दिलीप धनगर यांनी अनेकवेळा महावितरणच्या रायपूरजवळील चिंचोली कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही धनगर यांचे देण्यात आलेल्या बिलाचे कारण सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत चिंचोली येथील महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. राऊत यांच्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इन्फो :

माझ्या शेतात वीज जोडणीसाठी २५ मार्च २०१४ मध्ये डिमांड नोट भरूनही महावितरण प्रशासनाने वीज जोडणी दिलेली नाही. वरून नंबर आल्यावर, वीज जोडणी होणार असल्याचे सात वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, सात वर्षांत विजेची जोडणी नसताना दीड लाखाचे वीजबिल आल्यामुळे मला धक्काच बसला आहे. या बिलाबाबत चिंचोली कार्यालयात अनेकवेळा जाऊनही न्याय मिळालेला नाही.

-दिलीप धनगर, शेतकरी, रायपूर