शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी - विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी - ९ ...

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी

- विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी

- ९ हजार ८४० शेतकऱ्यांना देण्यात आली मालाची किंमत

- ९ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी १७ लाख ५१ हजार १६७ रुपयांची अदायकी

- ७ हजार शेतकऱ्यांना मिळाली नाही चुकऱ्यांची रक्कम

- पणन महासंघाकडे अंदाजे १५० कोटी रुपये घेणे बाकी

राज्याची स्थिती

- राज्यात १ हजार ८०० कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी

- १ हजार २१० कोटी रुपयांची केली अदायगी

- सुमारे २० हजार शेतकऱ्यांना ६२५ कोटींची अदायगी देणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पणन महासंघाने दिलेले नाहीत. राज्यातील २० हजार शेतकऱ्यांना अद्याप ६२५ कोटी रुपयांचे चुकारे देणे बाकी असून, यामध्ये जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने १५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, या कर्जास शासनाने हमी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच चुकाऱ्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती कापूस पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’ ला दिली.

मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या हंगामाकरिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार पणन व सीसीआयच्या माध्यमातून खरेदी सुरु आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे दर वाढल्याने खासगी बाजारात देखील आता कापसाला चांगला उठाव मिळाला आहे. त्यामुळे पणन व सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांचा कल आता खासगी बाजाराकडे वळला आहे.

निर्यात वाढल्याने बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे कापसाची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे गठाण, सरकीचे भाव वाढले आहेत. तसेच मागणी देखील जास्त असल्याने कापसाचे दर खासगी बाजारात ६ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बांग्लादेश, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये भारताच्या कापसाची निर्यात देखील वाढली आहे. तर देशातंर्गत मिलांमध्येही कापसाला मागणी आहे. त्यामुळे कापसाची मागणी वाढली असून, आतापर्यंत सर्व गरजू शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. सधन शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मागणी असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर वाढले असल्याची माहिती कापूस बाजारातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली.