शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दीड वर्षात रस्ते अपघातात 657 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2017 11:24 IST

1 हजार 417 अपघात : सायबर गुन्हे, महिला सक्षमीकरण व अपघाताबाबत जनजागृती

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.4 - जिल्ह्यात दीड वर्षात 1 हजार 417 अपघात झाले असून त्यात 657 जणांचा मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू हे 20 ते 50 या वयोगटातील पुरुषांचाच झालेला आहे. सरासरी दिवसाला 5 अपघात होतात व त्यात दोन जणांचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हे अपघात रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्हे व महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
शहरातील महाविद्यालय व विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक व विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसाठी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात सोमवारी जनजागृती परिसंवाद झाला. 
कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी  (गृह) आदी व्यासपीठावर होते. दीपप्रज्वालनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी व सुरक्षा रक्षकांना पोलीस मित्र बनवा
अपर्णा मकासरे, पंकज ठाकूर, राजेंद्र वाघोदे, अमोल बाविस्कर, पीतांबर भावसार, यजुर्वेद्र महाजन, पत्रकार शेखर पाटील, अॅड. सूरज जहांगीर, डॉ. बोरकर यांच्यासह अनेक जणांनी चर्चेत सहभाग घेतला. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सायबर क्राईमला फाईट देण्यासाठी सायबर क्लब स्थापन करण्याची घोषणी केली.
कायदा पाळला तर घटनांना आळा
 अनेक जण वाहने हौस व गरज म्हणून वापरतात. कमी वयात विद्याथ्र्याच्या हातात वाहने दिली जातात. मात्र कायद्याचे पालन केले जात नाही. 
केवळ पोलिसांवर जबाबदारी टाकून मोकळे होणे चालणार नाही. कायदा पाळला तर अनेक गंभीर घटना टळतील. प्राचार्य व मुख्याध्यापकांनी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. पाटील यांनी केले.