शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांकडील थकीत रकमेत ५० कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

पाच पट दंड माफ झाल्याने दिलासा : शासनाने निर्णय दिल्यानंतर आता कारवाईचे अडथळेही दूर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

पाच पट दंड माफ झाल्याने दिलासा : शासनाने निर्णय दिल्यानंतर आता कारवाईचे अडथळेही दूर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे तब्बल ९ वर्षांपासून असलेल्या थकीत भाड्यावर मनपाने लावलेला पाच पट वसुलीचा दंड शासनाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळे गाळेधारकांकडे थकीत असलेल्या एकूण रकमेत तब्बल ५० कोटी रुपयांची घट झाली आहे. गाळेधारकांच्या दृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे; मात्र गाळेधारक अजूनही २ टक्के शास्ती व रेडिरेकनरबाबतदेखील शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आता शासनाने निर्णय घेतल्यावर मनपा प्रशासनासाठी कारवाईचा मार्गदेखील मोकळा झाला आहे.

गाळेधारकांकडे ९ वर्षांची एकूण थकीत रक्कम ही ३०० कोटीपर्यंत होती. त्यात अनेक गाळेधारकांनी महापालिकेकडे ५ पट दंडाच्या रकमेसह पूर्ण रक्कम भरली होती. त्यामुळे ही मागणी काही अंशी कमी झाली होती. आता ५ पट दंडाची रक्कमदेखील आता कमी होणार असल्याने एकूण रकमेत ५० कोटींची घट होऊन गाळेधारकांकडे सुमारे २३० ते २४० कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे.

आता वसुलीचा मार्ग मोकळा

मनपा प्रशासनाने काही दिवसांपासून गाळेधारकांकडे असलेली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली होती; मात्र गाळेधारकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यामुळे मनपाने ही कारवाई थांबवली होती. आता शासनाने गाळेधारकांच्या मागणीप्रमाणे ५ पट दंडाचा मनपाचा निर्णय रद्द केला आहे. विशेष म्हणजे मनपाने रेडिरेकनरनुसार वसुली करण्यासह थकीत भाड्यावर लावण्यात आलेली २ टक्के शास्तीदेखील वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य शासनानेदेखील आता गाळेधारकांसाठी जे करायचे होते ते पूर्ण केले आहे. त्यामुळे आता मनपाकडून कारवाई अटळच आहे. यासाठी मनपाकडून बैठकांचे सत्र सुरू आहे.

ज्यांनी रक्कम भरली त्यांची रक्कम होणार समायोजित

तीन वर्षांपूर्वी मनपाचे तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुली केली होती. यावेळी गाळेधारकांनी ५ पट दंडाच्या रकमेसह ही रक्कम भरली होती. आता शासनाने ५ पट दंड रद्द केल्यामुळे ज्या गाळेधारकांनी आधी ही रक्कम भरली आहे, अशा गाळेधारकांच्या भरलेल्या रकमेतून आधी भरलेली रक्कम इतर भाड्यात समायोजित करण्याचेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत.