शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीतील पिकांची पेरणी दीड पटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला ...

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला आहे. तालुक्याचे रब्बी पिकांचे क्षेत्र सरासरी १४६९२ हेक्टरवर आहे. यंदा मात्र, तब्बल २४७३५.५ हेक्टरवर पेरा झाला असून, दीड ते पावणेदोन पटीने हा पेरा वाढला आहे.

बदनापूर तालुक्यात पाच महसूल मंडळ असून, यापैकी बदनापूर महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण ९७५७ हे भौगोलिक क्षेत्र आहे. ७३५१.२ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. या क्षेत्रापैकी २४४८ हे क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य पिके व ५६२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. रोषणगाव महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५६२.८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९८८.५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९५१ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १४८४ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. दाभाडी महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५२८.५ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ११८१६.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९३० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १००२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

शेलगाव महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १६३२६.१२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९३०.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६१७० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व २०२३ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी केली आहे. बावणे पांगरी महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण २१३४२.२ हे भौगोलिक क्षेत्र असून, १६८१२.३ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६२१६.५ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व ११८० हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

गहू, हरभरा, मक्याचा पेरा अधिक

तालुक्यात रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा अशी रब्बी पिके व जवस, करडईसह इतर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मक्याचा पेरा सरासरीपेक्षा अडीच पटीने वाढला आहे. अनेक वर्षांनंतर यंदा तालुक्यात प्रथमच रब्बी पिकांचा पेरा कमालीचा वाढला आहे. तालुक्यातील पीरवाडी, धनगरवाडी व राजेवाडी या गावांमधील रब्बी पिकांचा पेरा मात्र शून्य दिसत आहे.