शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

शेकडो वृक्षांची कत्तल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:02 AM

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. लाकडाने भरलेली वाहने रस्त्याने जाताना पाहावयास मिळत आहेत. तरीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे ही वाहने सर्रास पोलीस ठाण्यासमोरून जात आहेत. यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अनेकदा वनप्रेमी लाकडाने भरलेले वाहने दिसताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवितात. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. घनसावंगी तालुक्यातून जायकवाडीचा डावा कालवा गेला असल्याने तालुक्यात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या वाढली. परंतु, मागील चार महिन्यांपासून औरंगाबाद, पिंपळगाव व परतुर येथील काही व्यापारी सर्रासपणे दलालांमार्फत अनेक गावांमध्ये वृक्षतोड करित आहेत. तसेच नियमित १० ते २० ट्रॅक्टरद्वारे तोडलेल्या वृक्षांची वाहतुक करित आहेत. अनेकदा व्यापारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला आग लावतात. यानंतर मशिनच्या त्या वृक्षाची दोन तासात कत्तल केली जाते. तसेच पाचोड ते आष्टी राज्यमार्गाचे काम सुरू असल्यानेही लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे.घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली, बोडखा, मांदळा, घोनसी, शिंदखेड, देवी देगाव, लिंबूनी या परिसरातील वनराई व्यापा-यांनी पुर्णपणे नष्ट केली आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, येथे दिवसाढवळ््या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :environmentवातावरणforestजंगलNatureनिसर्ग