शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'साहेब, मदत साऱ्यांनाच मिळायला पाहिजे'; दानवेंवर शेतकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:43 IST

प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला

- संजय देशमुख 

जालना : यंदाचा साल गेल्या सालापेक्षा लई खराब चाललाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. आता अधिकारी आणि कर्मचारी शेतात पंचनामे करीत आहेत. मात्र, प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला. दानवेंसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. 

दानवे यांनी मंगळवारी सकाळी जालना तालुक्यातील दरेगाव शिवारालगत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येण्याचा आग्रह मंत्र्यांना केला. प्रारंभी दानवे यांनी कपाशी तसेच मका पिकांचे जे शेतात जास्त नुकसान झाले आहे. तेथे जाऊन पाहणी केली. एका महिला शेतकऱ्याने आम्ही ही जमीन गावातीलच एका शेतकऱ्याकडून भाडे पद्धतीने घेतली आहे, असे सांगितले. यावर दानवे यांनी संबंधित शेती मालक ढवले यांच्याशी चर्चा करून शेती कसणाऱ्या कुटुंबाला देखील शासकीय मदतीतून हिस्सा द्यावा, असे सांगितले. शेतातील पाहणी आटोपल्यानंतर दानवे यांनी दरेगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी विष्णू पिवळ या तरूण शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.   पंचनामे ज्या प्रमाणे होतील, तशी नुकसान भरपाई सर्वांनाचा मिळेल अशी ग्वाही  दानवे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याच्या वेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. 

बँक व्यवस्थापकाची घेतली झाडाझडती 
शेतकऱ्यांशी संवाद सुरू असतानाचा राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी दिली आहे. ती किती जणांनी मिळाली, असे विचारल्यावर अनेकांनी ती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुमची बँक कोणती असा सवाल दानवे यांनी करून थेट बँकेच्या अधिकाऱ्याला मोबाईलवरून संपर्क केला. यावेळी २८६ शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्याकडून दानवे यांनी मोबाईलचा स्पीकर आॅन करुन ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. अशांची यादीच वाचून घेतली. तसेच प्रशासनाने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच त्या पोहोचल्यामुळे आम्हाला फटका बसला. (लीड कमी मिळाली) असे सांगून हशा पिकविला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे