शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

रांजणी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, धनबाद-मनमाड या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी ...

रांजणी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, धनबाद-मनमाड या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये बसण्यासाठी आरक्षण गरजेचे असते, तसा प्रवास करता येत नाही. रांजणी येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांची गर्दी असते. मागील वर्षभरापूर्वी राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद करण्यात आले होते. रेल्वे, बस, विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. हळूहळू सर्वच व्यवहार सुरू करण्यात आले. केंद्र शासनाने विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या. परंतु, अद्यापही पॅसेंजर गाड्या न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. प्रवाशांना जास्तीचे तिकीट काढून स्पेशल गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. एक्स्प्रेस गाडीसाठी रांजणी येथून औरंगाबादला जाण्यासाठी ८० तर जालन्याला ६० रूपये मोजावे लागतात. तर पॅसेंजर गाडीसाठी औरंगाबादला जाण्यासाठी २५ तर जालन्याला १० रूपये द्यावे लागतात. सध्या येथील प्रवाशांना एक्स्प्रेस गाडीने जास्तीचे भाडे देऊन जावे लागत आहे. यामुळे प्रवाशी हैराण झाले आहे. शिवाय एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मी नेहमी परभणी औरंगाबाद, जालना येथे रेल्वेने जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने एक्स्प्रेस गाडीने जावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, खिशाला आर्थिक फटका बसत आहे. केंद्र शासनाने तातडीने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, असे एका प्रवाशाने सांगितले.

गेल्या दहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे. एक्स्प्रेसमुळे तिकीट जास्त लागत आहे. यात आरक्षित तिकीट स्थानकावर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

निलेश वालझाडे, प्रवासी