शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

महामार्गावर बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:40 AM

भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. अपघातातील मयत हे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा येथील रहिवासी आहेत.हमीदखॉ नुरखॉ पठाण (५०) व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खॉ पठाण (३९) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील हमीदखाँ पठाण हे त्यांच्या पत्नीसमवेत रविवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- एफ.एन.६८३४) शेकटा येथून बदनापूरकडे जात होते. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर भरधाव खासगी बसने (क्र.जी.एस.०१-सी.आर.६६६६) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील हमीदखाँ नूरखाँ पठाण व त्यांची पत्नी ताहेराबी हमीद खाँ पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच सपोनि राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी शेख शमशोद्दीन शेख लालमियाँ (रा. शेवगा ता.जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसच्या चालकाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिंगाळे हे करीत आहेत. पठाण दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.दुचाकीसाठी वेगळा मार्गच नाहीजालना-औरंगाबाद महामार्ग बनविताना दुचाकीचा विचार करण्यात आलेला नाही. या महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून, दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. परिणामी झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक