शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील १०९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

जालना : विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी ...

जालना : विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील वाड्या, तांडे, वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या १०९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.

मध्यंतरी इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढू लागला. खासगी इंग्रजी शाळांमध्ये वार्षिक हजारो रुपयांची फी भरून पालक मुलांना शिक्षण देत होते. त्यामुळे घटणाऱ्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनेही विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाल्याने अनेक पालकांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यास सुरुवात केली. अनेक उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती असोत किंवा क्रीडा स्पर्धा असोत, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आपली छाप सोडत आहेत.

कोरोनामुळे चालू वर्षात शाळा भरल्याच नाहीत, तर शिक्षण विभागाच्या अहवालानुसार गत शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील १०९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी गावस्तरावरील शिक्षणप्रेमींची मदत घेतली जात आहे. शिवाय शिक्षकांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवाय ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तेथील शिक्षकांना गरजेनुसार इतर शाळांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे.

पटसंख्या वाढीसाठी पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक वाटपासह इतर उपक्रम राबविले जात आहेत. एकूणच कोरोनाची स्थिती आहे. शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन, गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांची शाळांमधील संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

तालुकानिहाय स्थिती

जिल्ह्यातील तब्बल १०९ शाळांची पटसंख्या २० हून कमी आहे. यामध्ये सर्वाधिक ३७ शाळांची पटसंख्या २० हून कमी आहे. त्यासोबत जालना तालुक्यातील ८, बदनापूर तालुक्यातील ९, अंबड तालुक्यातील ८, घनसावंगी तालुक्यातील १२, परतूर तालुक्यातील १, मंठा तालुक्यातील १५ व जाफराबाद तालुक्यातील १९ शाळांचा यामध्ये समावेश आहे.

शिक्षकांचे काय?

ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे आणि शिक्षक जास्त आहेत, अशा शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची इतर शाळांमध्ये बदली केली जाणार आहे. शिवाय शाळेत राहणारा शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासह इतर प्रशासकीय कामकाज पूर्ण करणार आहे.

विद्यार्थ्यांचे काय ?

जिल्ह्यातील जवळपास १०९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० हून कमी आहे. या शाळा वाड्या, वस्त्या, तांड्यावरील आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी शालेय स्तरावरून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याकामी शिक्षणप्रेमींची मदत घेतली जाणार आहे.

पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न

जिल्ह्यातील ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, तेथील शिक्षकांची गरजेनुसार इतरत्र बदली केली जाणार आहे. शिवाय संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठीही शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी प्रा.

अशी आहे आकडेवारी

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या १५०४

प्रशासकीय कारणास्तव एकत्रित केलेल्या शाळा २०

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा १०९