शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडत पुढे ढकलल्याने सदस्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

मंठा : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेच्या अगोदर सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते, परंतु शासनाने आरक्षणाला स्थगिती दिली. ...

मंठा : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेच्या अगोदर सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते, परंतु शासनाने आरक्षणाला स्थगिती दिली. मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आहे. आरक्षण सोडतीची तारीख १ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती ती पुन्हा पुढे ढकलल्याने ५० ग्रामपंचायतींमधील पॅनंल प्रमुख, महिला सदस्यांसह त्यांच्या पतीराजांचा जीव टांगणीला लागला आहे.

मंठा तालुक्यात पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धूळ चारत सुशिक्षित तरुणांना संधी दिली. कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात मंठा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ५२ ग्रामपंचतींच्या निवडणुका होणार होत्या. परंतु मंगरूळ आणि केदार वाकडी ही दोन पुनर्वसित गावे असल्यामुळे या गावांना महसुली दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे तेथील निवडणुका झाल्या नसल्याने तालुक्यात ५० ग्रामपंचतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.

तालुक्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना धूळ चारत तरुण पॅनेल प्रमुखांनी ग्रामपंचायतीचे सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यात पॅनेल प्रमुख प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी कानडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य निवडून आणले. देवगाव खवणे येथे भाजपचे आठ वर्षे तालुकाध्यक्ष आणि सध्या दोन वर्षांपासून उपजिल्हाध्यक्ष असूनसुद्धा येथील काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे यांनी सर्व उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायत ताब्यात घेतली. जयपूर येथे प्रथमच डॉ. काकडे आणि शंतनू काकडे यांनी सर्वच सदस्य निवडून आणले आहेत. पांगरा गडधे-किनखेडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रसाद गडधे यांनीदेखील अशाच प्रकारे कामगिरी केली. विडोळी गावातील पॅनेल प्रमुख तथा मंठा बाजार समितीचे सभापती संदीप गोरे यांनी नऊ पैकी सहा जागा जिंकून आपले नेतृत्व सिद्ध करून दाखविले आहे.

---------------------

बहुमत मिळूनही पदापासून रहावे लागणार दूर

तालुक्यातील काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीत काही पॅनेलला बहुमत मिळाले असले, तरी आरक्षण सोडतीनुसार सरपंचपदाचे उमेदवारच पराभूत झाल्याने बहुमत असूनदेखील त्यांना सरपंचपदापासून दूर रहावे लागणार आहे.