शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जालना जिल्ह्यात नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:22 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, बाजारात येणारा कापूस अद्यापही शेतात, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान

जालना : जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.पावसाळ्याच्या प्रारंभी वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. कसेबसे अत्यल्प पावसावर पिकांनी तग धरला होता. ज्यावेळी पिके हातातोंडाशी आली त्याचवेळी परतीच्या पावसाने घात केला. यामध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसल्याचे चित्र आहे. त्या पाठोपाठ कपाशीही काळवंडली असून, काही ठिकाणच्या कपाशीला पुन्हा कोंब फुटले आहेत. वास्तविक पाहता कापूस बाजारपेठेत येण्याचे हे दिवस असताना आज कापसाच्या वेचणीचाच मुद्दा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.पिकांप्रमाणेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची, नंदापूर आणि अन्य भागातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विमा कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर विमा काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याने विमा काढावा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यात द्राक्षापाठोपाठ डाळींबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या फळबागेलाही अवकाळी पावसाचा जोरदर फटका बसला असून, यामुळे फळबाग उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने केले गेले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रRevenue Departmentमहसूल विभाग