शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जालना जिल्ह्यात नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:22 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, बाजारात येणारा कापूस अद्यापही शेतात, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान

जालना : जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.पावसाळ्याच्या प्रारंभी वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. कसेबसे अत्यल्प पावसावर पिकांनी तग धरला होता. ज्यावेळी पिके हातातोंडाशी आली त्याचवेळी परतीच्या पावसाने घात केला. यामध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसल्याचे चित्र आहे. त्या पाठोपाठ कपाशीही काळवंडली असून, काही ठिकाणच्या कपाशीला पुन्हा कोंब फुटले आहेत. वास्तविक पाहता कापूस बाजारपेठेत येण्याचे हे दिवस असताना आज कापसाच्या वेचणीचाच मुद्दा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.पिकांप्रमाणेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची, नंदापूर आणि अन्य भागातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विमा कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर विमा काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याने विमा काढावा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यात द्राक्षापाठोपाठ डाळींबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या फळबागेलाही अवकाळी पावसाचा जोरदर फटका बसला असून, यामुळे फळबाग उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने केले गेले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रRevenue Departmentमहसूल विभाग