शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांत वाढ; एसटीची प्रवासी संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटी बसने प्रवास करीत होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन केल्याने ...

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटी बसने प्रवास करीत होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन केल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली. लॉकडाऊनमुळे सर्वच बसेस बंद होत्या. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागला. काही दिवसांनी कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल केले. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात दररोज केवळ ५० हजार लोक एसटीने प्रवास करीत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने यात आणखी घट झाली झाली आहे. आता दररोज ३९ ते ४१ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. त्यातच वाढलेली रुग्णसंख्या व बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला उधाण आले आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास एसटी महामंडळाला मोठे नुकसान होणार आहे.

जालना जिल्ह्यात चार आगार आहेत. यात जाफराबाद, परतूर, अंबड व जालना यांचा समावेश होतोे. जिल्ह्यातून दररोज शेकडो बसेस ये-जा करतात. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे.

पूर्ण मार्गावर निम्मे प्रवासी

जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. बहुतांश लोक बसनेच प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाला चांगले उत्पन्नदेखील मिळते. परंतु, सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे पूर्ण मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. एरवी एका बसमध्ये ३२ जण प्रवास जातात. आता केवळ १० ते १५ प्रवासी जात असल्याचे सांगण्यात आले.

११ मार्गावर एसटी बंदच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास २०० बसेस बंद होत्या. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १९९ बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही ११ मार्गावरील बसेस बंद आहेत. दरम्यान, शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता रुग्णसंख्या वाढल्याने प्रवासी संख्या पुन्हा घटली आहे.

ना मास्क ना डिस्टन्सिंग

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. असे असताना प्रवाशांकडून नियमांचे पालन केले जात नाही. बहुतांश प्रवासी ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.