शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

अपघाताची वार्ता कळताच शंकरनगर शोकाकुल, अनेकांना अश्रू अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:20 AM

भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद येथील चुलत्याच्या तेराव्यासाठी (गोडजेवणासाठी) जुना जालना शंकरनगर भागातील रिक्षाचालक रमेश रामलाल जाधव यांच्या रिक्षातून बुधवारी सकाळी ८ वाजता रमेश व त्यांची पत्नी वगळता घरातील कुटुंब निघाले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्याच्या पुढे त्यांच्यावर काळाने घाला घातला. भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणारे रमेश जाधव यांच्या चुलत्याचे दहा दिवसांपूर्वी औरंगाबादेतील बेगमपुरा येथे निधन झाले. त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम बुधवारी होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाधव कुटुंब स्वत:च्या रिक्षातून औरंगाबादकडे जात होते. रिक्षा दिनेश जाधव हे चालवत होते. ते औरंगाबादकडे जात असल्याने बरोबर डाव्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना कारने जोरदार धडक दिली. यात रिक्षातील पाचही जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच या प्रभागाचे नगरसेवक माऊली ढवळे तसेच त्यांच्या मित्रांनी औरंगाबाद गाठले. त्यांनी तेथे जाधव कुटुंबाला पूर्ण ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.जाधव कुटुंबातील मधला भाऊ रमेश जाधव आणि त्यांची पत्नी घरी थांबल्याने ते या अपघातातून बचावले. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दिवसभर ते व त्यांच्या पत्नीने पाण्याचा घोटही घेतला नाही. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.शंकरनगरात २५ वर्षांपासून वास्तव्यशंकरनगर परिसरात जाधव परिवार हा गेल्या २५ वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांचे आणि शंकरनगरवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती त्यांच्याशेजारील प्राचार्य अ‍ॅड. दिनकर पाठक यांनी दिली. तसेच पूर्वीचे शिवसेनेचे नगरसेवक राम सतकर हे देखील मदतीसाठी धावून आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर जाधव कुटुंबाच्या घराजवळ विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ज्येष्ठ महिलांनी रमेश जाधव व त्यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसले. तसेच पाणी आणि दोन घास खाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी कोणाची विनंती ऐकली नाही.शंकरनगर येथील जाधव कुटुंबातील दिनेश रामलाल जाधव (३२), रेणुका दिनेश जाधव (२५), अतुल दिनेश जाधव (६ महिने), वंदना गणेश जाधव (२७), सोहम गणेश जाधव (९) या पाच जणांवर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जो तो जाधव कुटुंबांच्या आठवणी सांगत होता. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSocialसामाजिक