शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 6:03 PM

Dombivli Blast : डोंबिवलीतील अमूदान केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीएमआयडीसीतील अंबर (अमूदान) केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.या घटनेत आत्तापर्यंत ११ निरपराधांचे बळी गेले असून अद्यापही घटनास्थळी मानवी अवशेष सापडत आहेत. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूला रासायनिक कारखान्याला चिकटून राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या स्फोटानंतर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असून कोर्टाने मलय मेहताला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता कोर्टात आरोपीच्या वकिलाने स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत धक्कादायक माहिती दिली.

डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ११ जणांचे मृत्यू झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर दिवसभर शोधकार्य करण्यात येत होतं. मात्र रात्री अचानक पुन्हा कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली होती. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी आणि मलय मेहता यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर कोर्टाने मलय मेहता यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मालती मेहता यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे. मालती मेहता यांच्या पतीच्या निधनानंतर कंपनी मुलाच्या नावावर करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. मात्र सुनावणीदरम्यान,मेहतांच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली.

स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र नंतर स्फोट झालेल्या कंपनीमध्ये कोणताच बॉयलर नसल्याची माहिती पुढे आली. हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. शनिवारी कोर्टात  मेहतांच्या वकिलांनी, स्फोटाआधी कंपनीचे मालक देखील तिथे जाणार होते. मात्र त्यांना उशीर झाल्याने ते तिथे पोहचू शकले नाहीत. नाहीतर त्यांच्यासोबतही काहीतरी घडले असते असे सांगितले. हा स्फोट हा वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचे वकिलाने सांगितले. तसेच मेहता यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या आणि सर्व नियमांचे पालन केले होते.

या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणाऱ्या प्रियेश सिंग यांनी ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने सांगितले की तापमान वाढल्यामुळे हा स्फोट झाला. पण तिथले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने काय केल? तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे हे झालं असा आरोप प्रियेश सिंग यांनी केला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोटMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी