शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:36 PM

धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

परतूर (परभणी) : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. अखेर बुधवारी दुपारनंतर धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातीलपाणी परभणीकडे झेपावले आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना पाणी सोडल्यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे.

निम्न दुधना प्रकल्पात केवळ आता मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातूनच परभणी जिल्ह्यातील जनावरांच्या पिण्याचे पाणी व परिसरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी धरणातून दुधना नदीच्या पात्रातून बुधवारी दुपारी ३:३० वाजता धरणाचे ६ दरवाजे ०.५० मीटरने उघडून ५ हजार ३४६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जीवित, वित्त हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सोडले पाणी.धरण मृत साठ्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पात्रातून पाणी सोडण्यास विरोध केला होता. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने आदेश देऊन सदरील पाणी सोडले आहे. पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी युवा नेते नितीन जेथलिया, दादाराव खोसे, बाजीराव खरात, अंशीराम कबाडी, आसाराम लाटे, शिवाजी लाटे, गणेश राजबिंडे, बाबासाहेब लाटे, माउली घेंबड, कैलास बिडवे, हरिभाऊ आकात, आदी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

पाण्याचा अपव्यय होऊ नये - नितीन जेथलियायुवा नेते नितीन जेथलिया म्हणाले की, टंचाई निवारण्यासाठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, नदीपात्रातून सोडण्यात येणारे पाणी हे मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे. धरण मृत साठ्यावर गेलेले आहे. त्यामुळे टँकरद्वारे हे पाणी घ्यावे व किमान १ जूनपर्यंत तरी पाणी सोडू नये, अशी आमची मागणी नितीन जेथलिया यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र