शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक -कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:57 PM

येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची केवळ दिशाभूल केली आहे. अच्छे दिन च्या नावाखाली आज मंदीचे सावट सर्वत्र दाट झाले आहे. यामुळे सामान्य माणूस हैराण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.त्यांनी जालना विधासभेतील विविध गावांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, बाजीउम्रद तांडा, मोतीगव्हाणसह अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. अनेकांनी पीकविमा, कर्जमाफी ही फसवी कशी आहे, याची अनेक उदाहरणे दिली. तसेच पीकविम्याच्या नावाखाली सरकारने विमा कंपन्यांचीच तिजोरी भरली आहे. यात शिवसेना सत्तेत राहून मोर्चा काढण्याची वेळ थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवरच आली आहे, यावरूनच विमा कंपन्यांनी सरकारलाच कसे फसवले हे लक्षात येते.आजही अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. बँकाकडून अडवणूक सुरू आहे. मध्यवर्ती बँकेचे आपण उपाध्यक्ष असल्याने तेथे जातीने लक्ष घालून कर्ज वाटपाचा टक्का यंदा वाढवल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला.एकूणच या राज्यात केवळ राजकीय नौटंकी सुरू आहे. अनेकांना पक्षात घेऊन निवडणुका जिंंकता येतात हा समज जनता यापुढे सहन करणार नसल्याचा विश्वास आपल्याला असल्याचे प्रतिपादनही गोरंट्याल यांनी केले.यावेळी त्यांनी विविध शेतक-यांच्या घरी जाऊन समस्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश चौधरी, गणेश खरात, संजय शेजूळ, सोपान तिरुखे, अंजेभाऊ चव्हाण, युवराज चव्हाण, दत्ता पा. शिंदे, नारायण वाढेकर, राजेंद्र शिंदे, मल्हारी पठाडे, समाधान शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक