शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक -कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:58 IST

येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची केवळ दिशाभूल केली आहे. अच्छे दिन च्या नावाखाली आज मंदीचे सावट सर्वत्र दाट झाले आहे. यामुळे सामान्य माणूस हैराण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला नागरिकांनी खाली खेचावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
त्यांनी जालना विधासभेतील विविध गावांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, बाजीउम्रद तांडा, मोतीगव्हाणसह अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. अनेकांनी पीकविमा, कर्जमाफी ही फसवी कशी आहे, याची अनेक उदाहरणे दिली. तसेच पीकविम्याच्या नावाखाली सरकारने विमा कंपन्यांचीच तिजोरी भरली आहे. यात शिवसेना सत्तेत राहून मोर्चा काढण्याची वेळ थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवरच आली आहे, यावरूनच विमा कंपन्यांनी सरकारलाच कसे फसवले हे लक्षात येते.
आजही अनेकांना पीककर्ज मिळालेले नाही. बँकाकडून अडवणूक सुरू आहे. मध्यवर्ती बँकेचे आपण उपाध्यक्ष असल्याने तेथे जातीने लक्ष घालून कर्ज वाटपाचा टक्का यंदा वाढवल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला.
एकूणच या राज्यात केवळ राजकीय नौटंकी सुरू आहे. अनेकांना पक्षात घेऊन निवडणुका जिंंकता येतात हा समज जनता यापुढे सहन करणार नसल्याचा विश्वास आपल्याला असल्याचे प्रतिपादनही गोरंट्याल यांनी केले.
यावेळी त्यांनी विविध शेतक-यांच्या घरी जाऊन समस्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश चौधरी, गणेश खरात, संजय शेजूळ, सोपान तिरुखे, अंजेभाऊ चव्हाण, युवराज चव्हाण, दत्ता पा. शिंदे, नारायण वाढेकर, राजेंद्र शिंदे, मल्हारी पठाडे, समाधान शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक