शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

गोंदेगाव येथे ६५० जणांचे लसीकरण जालना : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव अंतर्गत गोंदेगाव येथे कोविड लसीकरण मोहिमेचा ...

गोंदेगाव येथे ६५० जणांचे लसीकरण

जालना : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव अंतर्गत गोंदेगाव येथे कोविड लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला. या वेळी ६५० जणांचे लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच साहेबराव वाघ, ग्रामसेवक नारायण शेळके, शेख फकीर, डाॅ. हरकळ, बदर पाटील, पैठणे, भालतीडक, शिनगारे, कोल्हे, मच्छिंद्र वाघ, सुरेश तिडके, शाहाजी घोडके, तुळशीराम वाघ आदी हजर होते.

मेघराज शिंदे सायंटिस्ट परीक्षेत राज्यात दुसरा

परतूर : येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मेघराज शिंदे हा होमीभाभा ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेत राज्यात दुसरा आला असून, सिल्व्हर मेडल पटकावले आहे. याबद्दल त्याचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थाचालक संदीप बाहेकर, प्रिन्सिपल महाजन, मगर, तिवारी, पांडे, आकात, भानुदास टकले, संपत टकले आदींची उपस्थिती होती.

मेस्ट संघटनेच्या उपाध्यक्षपदी संजय चव्हाण

मंठा : मेस्टा संघटनेची नुकतीच जालना येथे बैठक झाली. या बैठकीत संजय चव्हाण यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष पी. एन. यादव, राज्य सचिव सतीश मोरे, प्राध्यापक डॉ. नामदेव दळवी, ज्ञानेश्वर पुंगळे, राजू तारे, बळीराम जाधव, सोपान सपकाळ, महेंद्रसिंग मोताफळे, सुभाष निर्वळ, बी. एम. गोरे आदींची उपस्थिती होती.

परतूर येथे वृक्षारोपण

परतूर : शहरातील विठ्ठलनगर येथे विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. आदर्श शिक्षक दिलीप मगर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक विष्णुपंत तोटे, विलास चव्हाण, कैलास कवले, बालाजी सांगुळे, कार्तिक कवले, धीरज गाडेकर आदींची उपस्थिती होती. आदर्श शिक्षक दिलीप मगर म्हणाले, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व कळले आहे; त्यामुळे प्रत्येकाने एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे.

वीजपुरवठा खंडित, ग्राहकांची गैरसोय

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात सतत तांत्रिक बिघाड होत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. अचानक वीज गुल होत असल्याने वीज ग्राहकांसह शेतकऱ्यांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.