शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारी जाहीर; जिल्ह्यात ९७२ गावांत ओला दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

जालना : खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले होते. आता ...

जालना : खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले होते. आता गावांची पैसेवारी शासन स्तरावरून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच ९७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

मागील काही वर्षांत गतवर्षी जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यामान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली खरीप पिके वाया गेली होती. विशेष म्हणजे नदीकाठच्या शेतांमधील तर मातीही वाहून गेली होती. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात अतिवृष्टी व पुरामळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. या सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सहा लाख ४२ हजार ६०४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती; परंतु सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कापूस सोयाबीन इत्यादी पिकांचे चार लाख ९३ हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. आता शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जिल्ह्यातील इतर ९७१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.

मदतीचा लाभ

ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत कमी आहे, त्या गावांमधील शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.