शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कृषी धोरणाचा पाया छत्रपतींनी घालून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST

जालना : रयतेचा लोककल्याणकारी राजा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील कृषी क्षेत्राचा पाया कसा असावा हे छत्रपती शिवाजी ...

जालना : रयतेचा लोककल्याणकारी राजा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील कृषी क्षेत्राचा पाया कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे प्रतिपादन विजय कुमठेकर यांनी केले.

बहुजन संघटकच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बहुजन संघटकचे प्रमुख राहुल खांडेकर, सर्वजीत बनसोडे, हर्ष थुल, सौरभ गाणार यांचा प्रमुख सहभाग होता. छत्रपतींचा इतिहास हा केवळ हिंदू- मुस्लिम धार्मिक लढाईसाठी नाही तर शेतकरी, कामगार यांच्या जीवावर सत्ता प्राप्त करुन त्यांनी आपल्या राज्यकारभारातून प्रशासकीय कारभार, लष्करी कारभार, राजकीय कारभार, न्यायालयीन कामकाज, परराष्ट्रीय धोरण, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व कृषी धोरण कसे असावे, याचा पाया घालून दिला.

लोकशाहीतील शेतकऱ्यांपेक्षा शिवशाहीतील शेतकरी अत्यंत आनंदी व समाधानी होता. कारण त्याला कधीच आजच्या शेतकऱ्यासारखी आत्महत्या करावी वाटली नाही. महाराष्ट्रातील सामान्य माणसाची नाळ ही शेतीशी निगडित आहे. भविष्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर माणसांचे व पशुधनांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पशुधन महत्वाचे आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी आपली जनावरे कसायास स्वस्तात विकू नये. पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब आडवावा व पाण्याचा जपून वापर करावा अशा सूचना दिल्या होत्या.

देशात सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना छत्रपतींनी आपल्या स्वराज्यात राबविल्या. त्यामुळे स्वराज्यातील जनता मरायला व मारायला सदैव तयार असलेली दिसून येते. पारंपरिक चालत आलेली पदे पाटील, देशमुख, सरदेशमुख, कुलकर्णी, पटवारी काढून घेतली. आपल्या सत्तेचे विकेंद्रीकरण केले. शेतकऱ्यांच्या हातात तलवार देऊन मनगटात बळ पेरण्याचे काम केले. आपल्या सेनेचे वर्तन कसे असावे हे सांगत रयतेची जीवापाड काळजी घेतली. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही विना परवानगी हात लावू नका असा आदेश दिला होता, असेही कुमठेकर म्हणाले.

दुष्काळात मदत

दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीचे अवजारे, बैल-बारदाणा सरकारी तिजोरीतून दिला गेला. आपल्या स्वराज्यात जलसिंचनाचे कामे करुन घेतली. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी राबविल्याचे कुमठेकर यांनी सांगितले.