शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:17 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे. बुधवारी सकाळी त्यांच्या नाकातून रक्त आले. त्यांना मोठा अशक्तपणाही आला होता, तरीही त्यांनी पाणी पिण्यास उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीस नकार दिला होता. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून अन्न व पाण्याविना असल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली होती. अखेर त्यांनी ती विनंती मान्य करत सलाईन घेतले. मात्र, मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने मराठा समाज बांधव, पत्रकार व डॉक्टरांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी पाणी प्यायले.  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती खालावली आहे. त्यांच्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये समर्थकांनी रात्रभर जागून त्यांना साथ दिली. यावेळी, डॉक्टर व स्थानिक पत्रकारांच्या विनंतीनंतर व मराठा समाज बांधवांच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी पाणी प्यायले. मात्र, त्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. दुसरीकडे सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे.  

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सर्वांनीच त्यांना पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे उपस्थित महिला व बांधव भावूक झाल्याचं दिसून आलं. अंतरवाली सराटीत समाजबांधवांचा ओघ वाढत चालला असून ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. तसेच, जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली जात आहे.

२० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, २० फेब्रुवारीला हे अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सगेसोयरे यासंदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. मराठा-कुणबी आरक्षणात सगेसायऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्यामुळे मनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.  

काय म्हणाले जरांगे ?

माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर ढकलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही देणे-घेणे नाही. ते भुजबळांना बळ देतायत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरी लोकं जातील. पंतप्रधानांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना