शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणुकीतून ५७ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST

तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या ...

तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या १७ पैकी १६ जागांसाठी भरलेले ५७ उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. तर केवळ एका जागेसाठी मतदानप्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या तीर्थपुरी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार असल्याची पहिली उद्घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २३ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. त्याची ३० दिवसांची मुदत २१ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यातच तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात यावी, असे पत्र नगरविकास खात्याने राज्य निवडणूक आयोगालाही दोन्ही वेळेस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून कोणत्या प्रकारची सूचना न आल्याने निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. त्यामुळे तीर्थपुरी या ठिकाणी दोनवेळा निवडणूक घेणे हे जनतेच्या हिताचे नाही, असा विचार करून गावातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी व ग्रामस्थांनी बैठक घेतली. बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी १७ जागांसाठी भरलेल्या १६ जागांवरील ५७ नामनिर्देशनपत्र परत घेण्यात आले. सर्वपक्षीयांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेऊन नगरपंचायतीसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. केवळ वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एका जागेसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिवाजी बोबडे, सरपंच शैलेंद्र पवार, अंकुश बोबडे, तात्यासाहेब चिमणे, गणेश पवार, नारायण बोबडे, रामप्रसाद बोबडे, मेहेरनाथ बोबडे, श्रीकष्ण बोबडे, रमेश बोबडे, कल्याण चिमणे, सचिन चिमने, विजय चिमने, श्रीराम गिरी, सुदाम मापारे, काकासाहेब कासार आदींनी प्रयत्न केले.

गावाच्या विकासासाठी निर्णय

तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. गावाचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तीर्थपुरी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि दोन वेळेसच्या निवडणूक प्रक्रियेत ग्रामस्थांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी सर्वपक्षीयांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीयांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे.