शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाम्ब्वेचे नागरिक म्हणतात, ‘आमचं मरण अटळ!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:25 IST

तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, आम्हीही माणूसच आहोत. आम्हालाही मरणाची भीती आहेच, पण जीवावर उदार होऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचा आटापिटा करीत असताना आमच्या आरोग्याची, आमच्या सोयीसुविधांची काळजीच जर सरकारला नसेल, साध्या साध्या गोष्टीही आम्हाला मिळणार नसतील, तर आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालावा?

ठळक मुद्देकोरोनाच्या काळात झिम्बाम्ब्वेमधील शेकडो डॉक्टरच संपावर!

लोकमत-

कितीही काळजी घ्या, कितीही दक्षता घ्या, दिवसातून पंधरा-वीस वेळा हात धुवा, चार भिंतीत कोंडून घालताना स्वत:ला क्वॉरण्टाइन करा, आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छता राखा, पण कोरोनाचा विषाणू आपल्याला शोधून काढून आपल्यावर आक्रमण तर करणार नाही, या भीतीनं अख्ख्या जगाला व्यापलेलं आहे. अशावेळी कदाचित आपल्याला वाचवू शकले तर केवळ डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणाच, हेही प्रत्येकाला माहीत आहे, पण अशा मोक्याच्या वेळी एकही डॉक्टर आपल्यासोबत नसला, आपल्यावर उपचार करायलाच कोणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या भावनेची भीती किती भयानक असेल याची कल्पनाच करता येणार नाही, पण ही स्थिती ओढवली आहे, झिम्बाम्ब्वे या देशातील नागरिकांवर. कारण त्या देशातील सार्वजनिक रुग्णांलयातील शेकडो डॉक्टरच बुधवारपासून संपावर गेले आहेत.
तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, आम्हीही माणूसच आहोत. आम्हालाही मरणाची भीती आहेच, पण जीवावर उदार होऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचा आटापिटा करीत असताना आमच्या आरोग्याची, आमच्या सोयीसुविधांची काळजीच जर सरकारला नसेल, साध्या साध्या गोष्टीही आम्हाला मिळणार नसतील, तर आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालावा?
तिथल्या डॉक्टरांच्या संघटनेचे प्रमुख तवांदा झ्वाकाडा म्हणतात, रुग्णसेवेची, त्यांची जीवाची काळजी आम्हाला आहेच, पण पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटही आम्हाला मिळणार नसतील, आमच्याच संरक्षणाची  काळजी सरकार घेत नसेल, आम्ही स्वत:च मरणाच्या दारात उभे असू, तर तुम्हीच सांगा, आम्ही काम करायचं तरी कसं? जोपर्यंत सरकार सार्‍या सुविधा पुरवित नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही. 
सर्वसामान्य नागरिकांतही अत्यंत हतबलतेची भावना आहे. मुतुर्वा आणि तिच्यासारखे अनेक नागरिक म्हणतात, कोरोनाची लागण व्हायचा अवकाश, ‘आम्ही मरणार’, हे पक्कं ठरलेलं आहे. कोणीच आम्हाला वाचवू शकणार नाही.’
झिम्बाम्ब्वेच्या सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. ती खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. अनेक अत्यावश्यक साधनं नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्यात विजेची टंचाई. अनेक ठिकाणी दिवसांत किमान आठ तास वीज नसते. 
याआधीही अनेक दिवस डॉक्टर संपावर गेले होते. कारण काही महिने  त्यांचा पगारच झालेला नव्हता. जानेवारी महिन्यात ते कामावर आले. त्याचंही कारण झिम्बाम्ब्वेचे टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक स्ट्रीव मासीयीवा यांनी देशातील दोन हजार डॉक्टर जर परत कामावर आले, तर त्यांचा  तीन महिन्यांचा पगार आपण स्वत: देऊ असं आश्वासन दिल्यावर! अर्थात त्यात फक्त डॉक्टरांचा समावेश होता, नर्सेसचा नाही! अशा परिस्थितीत कोण जगणार आणि कोण वाचणार?. दोष तरी कोणाला देणार?..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या