शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

झिम्बाम्ब्वेचे नागरिक म्हणतात, ‘आमचं मरण अटळ!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:24 PM

तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, आम्हीही माणूसच आहोत. आम्हालाही मरणाची भीती आहेच, पण जीवावर उदार होऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचा आटापिटा करीत असताना आमच्या आरोग्याची, आमच्या सोयीसुविधांची काळजीच जर सरकारला नसेल, साध्या साध्या गोष्टीही आम्हाला मिळणार नसतील, तर आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालावा?

ठळक मुद्देकोरोनाच्या काळात झिम्बाम्ब्वेमधील शेकडो डॉक्टरच संपावर!

लोकमत-

कितीही काळजी घ्या, कितीही दक्षता घ्या, दिवसातून पंधरा-वीस वेळा हात धुवा, चार भिंतीत कोंडून घालताना स्वत:ला क्वॉरण्टाइन करा, आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छता राखा, पण कोरोनाचा विषाणू आपल्याला शोधून काढून आपल्यावर आक्रमण तर करणार नाही, या भीतीनं अख्ख्या जगाला व्यापलेलं आहे. अशावेळी कदाचित आपल्याला वाचवू शकले तर केवळ डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणाच, हेही प्रत्येकाला माहीत आहे, पण अशा मोक्याच्या वेळी एकही डॉक्टर आपल्यासोबत नसला, आपल्यावर उपचार करायलाच कोणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या भावनेची भीती किती भयानक असेल याची कल्पनाच करता येणार नाही, पण ही स्थिती ओढवली आहे, झिम्बाम्ब्वे या देशातील नागरिकांवर. कारण त्या देशातील सार्वजनिक रुग्णांलयातील शेकडो डॉक्टरच बुधवारपासून संपावर गेले आहेत.तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, आम्हीही माणूसच आहोत. आम्हालाही मरणाची भीती आहेच, पण जीवावर उदार होऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचा आटापिटा करीत असताना आमच्या आरोग्याची, आमच्या सोयीसुविधांची काळजीच जर सरकारला नसेल, साध्या साध्या गोष्टीही आम्हाला मिळणार नसतील, तर आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालावा?तिथल्या डॉक्टरांच्या संघटनेचे प्रमुख तवांदा झ्वाकाडा म्हणतात, रुग्णसेवेची, त्यांची जीवाची काळजी आम्हाला आहेच, पण पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटही आम्हाला मिळणार नसतील, आमच्याच संरक्षणाची  काळजी सरकार घेत नसेल, आम्ही स्वत:च मरणाच्या दारात उभे असू, तर तुम्हीच सांगा, आम्ही काम करायचं तरी कसं? जोपर्यंत सरकार सार्‍या सुविधा पुरवित नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांतही अत्यंत हतबलतेची भावना आहे. मुतुर्वा आणि तिच्यासारखे अनेक नागरिक म्हणतात, कोरोनाची लागण व्हायचा अवकाश, ‘आम्ही मरणार’, हे पक्कं ठरलेलं आहे. कोणीच आम्हाला वाचवू शकणार नाही.’झिम्बाम्ब्वेच्या सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. ती खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. अनेक अत्यावश्यक साधनं नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्यात विजेची टंचाई. अनेक ठिकाणी दिवसांत किमान आठ तास वीज नसते. याआधीही अनेक दिवस डॉक्टर संपावर गेले होते. कारण काही महिने  त्यांचा पगारच झालेला नव्हता. जानेवारी महिन्यात ते कामावर आले. त्याचंही कारण झिम्बाम्ब्वेचे टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक स्ट्रीव मासीयीवा यांनी देशातील दोन हजार डॉक्टर जर परत कामावर आले, तर त्यांचा  तीन महिन्यांचा पगार आपण स्वत: देऊ असं आश्वासन दिल्यावर! अर्थात त्यात फक्त डॉक्टरांचा समावेश होता, नर्सेसचा नाही! अशा परिस्थितीत कोण जगणार आणि कोण वाचणार?. दोष तरी कोणाला देणार?..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या