शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 8:12 PM

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे.

इस्लामाबाद -तालिबानलाभारतासह सर्वच देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानची भूमी आता कुठल्याही देशाविरुद्ध वापरू दिली जाणार नाही. तालिबानभारताला या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग मानतो, असे तालिबानचा प्रवक्ता झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तवाहिनीनेही वृत्त दिले आहे.

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. अमेरिकन सैन्य माघारीच्या दोन आठवडे आधी, म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविला. अफगाणिस्तानमध्ये 'तेहरीक ए तालिबान पाकिस्तान' आणि 'इस्लामिक स्टेट' पुन्हा तोड वर काढण्याच्या शक्यते संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना मुजाहिद म्हणाला, "यापूर्वीही आम्ही स्पष्ट केले आहे, की आमची भूमी इतर कुठल्याही देशाविरोधात वापरू दिली जाणार नाही. आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. ”

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शेजारी असल्याने आणि त्यांचे हित एकमेकांशी संबंधित असल्याने त्यांना सोबत बसून प्रलंबित समस्यांवर तोडगा काढावा लागेल. याच बरोबर अफगाणिस्तान मुक्त केल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच शरिया कायद्यानुसार सरकार स्थापन होईल, असे मुजाहिदने म्हटले आहे.तालिबानने अफगाणिस्तानात राहणाऱ्या लोकांना वचन दिले आहे, की 'आपण सुरक्षित राहाल. तुमचा दरवाजा कुणीही ठोठावणार नाही. अफगाणिस्तानात कुणीही कुणाचे अपहरण करू शकणार नाही. कुणीही कुणाला मारू शकणार नाही, आम्ही नियमितपणे सुरक्षा वाढवू. आमच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे राहणीमान उंचावेल. याशिवाय, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, ही आमची पहिली जबाबदारी आहे. यानंतर लोक शांततेत राहू शकतील, असे तालिबानने म्हटले आहे.

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद