शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 9:05 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनीही ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी अडचणीची ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोदींना ४०० हून अधिक जागा ह्या संविधानामध्ये बदल करण्यासाठी हव्या असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा दावा खोडून काढताना मोदी आणि भाजपाची दमछाक होत आहे. दरम्यान, काँग्रेसचेकोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, तुम्ही कधी विचार केलाय की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. ते २७२ का म्हणत नाहीत? ५४३ खासदारांमध्ये निम्मं करा ना तुम्ही? म्हणजे २७२ होतात. ठीक आहे २७२ म्हणायला अवघड होतं मग ३०० म्हणा. पण ४०० का? ४०० पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदा बदलायचा आहे, असा घणाघाती आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्व नेत्यांनी ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्यावरून मोदी आणि भाजपाला घेरले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४