शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ यांच्या पदरी निराशा

By admin | Updated: October 24, 2015 03:07 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकेच्या दौऱ्यात भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्यांवर मोठी निराशा पदरी घ्यावी लागली असून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला.काश्मीर प्रश्नावर अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानने ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्याच्या पाकिस्तानने दिलेल्या आश्वासनाला अमेरिकेने ‘नवे पाऊल’ म्हटले आहे.बराक ओबामा आणि नवाज शरीफ यांच्यात गुरुवारी चर्चा झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, ‘‘दीर्घकाळपासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी करीत आहे. परंतु ओबामा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही त्यासाठी तयारी दाखविली तरच ते त्यास तयार होतील.’’ ओबामा-शरीफ यांच्या चर्चेत नियंत्रण रेषेवरील निगराणीसाठी ज्या प्रकारच्या व्यवस्थेचा उल्लेख संयुक्त निवेदनात आहे त्याबद्दलही हा अधिकारी म्हणाला, की त्यासाठीदेखील ते दोन्ही देश तयार असले पाहिजेत. भारत आणि पाकिस्तानने आपापसांतील प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडविले पाहिजेत.ओबामा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरीफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,‘‘काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा होत नसल्यामुळे अशा परिस्थितीत तिसऱ्या देशाने भूमिका बजावली पाहिजे. जर भारत यासाठी तयार नसेल तर त्यामुळे अडथळा निर्माण होईल.’’ पाकिस्तानविरोधात जे दहशतवादी गट होते त्यांच्यावर त्याने राष्ट्रीय कार्य योजनेअंतर्गत कारवाई केली. आता त्याने त्याच प्रकारे ‘लष्कर ए तोयबा’ आणि त्याच्या पाठीराख्या गटांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे. अणुकरारावर चर्चा नाहीचओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पाकिस्तानशी १२३ करारांवर कोणतीही चर्चा केली नाही. आम्ही नागरी अणु निर्यात करण्यासाठी अणुपुरवठा समूहात पाकिस्तानसाठी सूट मागणार नाही. अमेरिका पाकिस्तानशी अण्वस्त्रे करार करणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वृत्तात जे म्हटले ते अजिबात खरे नाही, असे हा अधिकारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला.अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या १२३ कराराला भारत-अमेरिका अणुकरार म्हटले जाते व त्याची रूपरेषा २००५ मध्ये तयार केली गेली होती. ओबामा व शरीफ यांनी पाकमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली. हा अधिकारी म्हणाला की, आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्याला संभाव्य धोका कोणता आहे याची चांगली जाणीव पाकिस्तानला आहे.निवेदनातील काश्मीर उल्लेखाकडे भारताचा कानाडोळानवी दिल्ली : अमेरिका व पाकिस्तान यांच्या संयुक्त निवेदनातील काश्मीरच्या उल्लेखास फारसे महत्त्व देणे भारताने शुक्रवारी टाळले. सोबतच अमेरिकेला दिलेली आश्वासने पाक पाळेल, अशी आशाही व्यक्त केली.अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्कर-ए-तोयबासह अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि शरीफ यांच्या भेटीनंतर यासंदर्भातील एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले होते. भारत-पाकने सर्व वादग्रस्त मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि लवचिक धोरण ठेवून चर्चा करावी, अशी अपेक्षा या संयुक्त निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.