शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
3
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
4
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
5
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
6
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
7
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
8
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
9
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
10
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
13
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
14
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
15
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
16
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
17
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
18
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
19
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
20
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
Daily Top 2Weekly Top 5

गलवान संघर्षानंतर एस जयशंकर पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंध स्थिर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:26 IST

S Jaishankar China Visit: गलवानमधील संघर्षानंतर भारत-चीन संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. या घटनेचा केवळ सीमेवरच नाही, तर राजकीय आणि आर्थिक परिणाम झाला होता.

S Jaishankar China Visit: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षात जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत-चीन संबंध मजबूत करणे, तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बिघडलेले संबंध पुन्हा रुळावर आणणे आहे. जयशंकर मंगळवारी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील आणि चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील.

२०२० ते २०२५ दरम्यान भारत-चीन संबंधांमध्ये विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. सीमा वादावरील तणाव निश्चितच कमी झाला आहे, परंतु त्याचा खोलवर परिणाम अजूनही दिसून येत आहे. भारत-चीन संबंधांमध्ये एकेकाळी सहकार्य होते, मात्र आता सावधगिरी बाळगली जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिल्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा चीन दौरा विशेष मानला जातोय. 

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेटअसे नाही की या वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये प्रगती झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातही बैठक झाली आहे. रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत झालेल्या या बैठकीनंतर चीनने म्हटले होते की, ते दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. बैठकीत, पंतप्रधान मोदींनी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखून योग्य पद्धतीने मतभेद आणि वाद सोडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यांनी म्हटले होते की परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि संवेदनशीलता हे संबंधांचा आधार राहिले पाहिजेत. 

भारत-चीन संबंध स्थिर गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये बरीच स्थिरता आली आहे. अशा वातावरणात, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमधील अर्थपूर्ण संवादासाठी एक महत्त्वाची पावले ठरू शकते. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, चीन आणि भारत दोघेही वेगाने वाढत आहेत. 

गलवान नंतर परिस्थिती बदललीजून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. हा संघर्ष गेल्या काही दशकांमधील दोन्ही बाजूंमधील सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. या संघर्षानंतर, भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या इतर ठिकाणांहून सैन्य हटवण्यासह गस्त घालण्यास सुरुवात करण्याच्या करारावर सहमती दर्शविली होती. पूर्व लडाखमध्ये सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेल्या लष्करी तणावाचे निराकरण करण्यासाठी या कराराकडे एक मोठे यश म्हणून पाहिले जात होते. २००३ मध्ये दोन्ही देशांमधील विशेष प्रतिनिधी यंत्रणा स्थापन झाली. तेव्हापासून दोन्ही बाजूंमध्ये २० वेळा चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीन