शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

गलवान संघर्षानंतर एस जयशंकर पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंध स्थिर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:26 IST

S Jaishankar China Visit: गलवानमधील संघर्षानंतर भारत-चीन संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. या घटनेचा केवळ सीमेवरच नाही, तर राजकीय आणि आर्थिक परिणाम झाला होता.

S Jaishankar China Visit: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षात जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत-चीन संबंध मजबूत करणे, तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बिघडलेले संबंध पुन्हा रुळावर आणणे आहे. जयशंकर मंगळवारी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील आणि चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील.

२०२० ते २०२५ दरम्यान भारत-चीन संबंधांमध्ये विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. सीमा वादावरील तणाव निश्चितच कमी झाला आहे, परंतु त्याचा खोलवर परिणाम अजूनही दिसून येत आहे. भारत-चीन संबंधांमध्ये एकेकाळी सहकार्य होते, मात्र आता सावधगिरी बाळगली जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिल्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा चीन दौरा विशेष मानला जातोय. 

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेटअसे नाही की या वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये प्रगती झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातही बैठक झाली आहे. रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत झालेल्या या बैठकीनंतर चीनने म्हटले होते की, ते दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. बैठकीत, पंतप्रधान मोदींनी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखून योग्य पद्धतीने मतभेद आणि वाद सोडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यांनी म्हटले होते की परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि संवेदनशीलता हे संबंधांचा आधार राहिले पाहिजेत. 

भारत-चीन संबंध स्थिर गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये बरीच स्थिरता आली आहे. अशा वातावरणात, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमधील अर्थपूर्ण संवादासाठी एक महत्त्वाची पावले ठरू शकते. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, चीन आणि भारत दोघेही वेगाने वाढत आहेत. 

गलवान नंतर परिस्थिती बदललीजून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. हा संघर्ष गेल्या काही दशकांमधील दोन्ही बाजूंमधील सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. या संघर्षानंतर, भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या इतर ठिकाणांहून सैन्य हटवण्यासह गस्त घालण्यास सुरुवात करण्याच्या करारावर सहमती दर्शविली होती. पूर्व लडाखमध्ये सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेल्या लष्करी तणावाचे निराकरण करण्यासाठी या कराराकडे एक मोठे यश म्हणून पाहिले जात होते. २००३ मध्ये दोन्ही देशांमधील विशेष प्रतिनिधी यंत्रणा स्थापन झाली. तेव्हापासून दोन्ही बाजूंमध्ये २० वेळा चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीन