शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 7:17 PM

PM Narendra Modi at United Nations General Assembly : भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) संबोधित करत आहेत. कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसेच कोरोना संकटात भारतानं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियान राबवलं. भारतात आता डिजिटल युग सुरू झाल्याचं देखील सांगितलं. याच दरम्यान त्यांनी UNमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. "भारतीय स्वातंत्र्याचं यंदा 75 वं वर्ष आहे. या वर्षात आम्ही भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार" असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 

भारत 'सेवा परमो धर्मा'अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ द्यायचा नसेल, तर आपण सजग राहायला हवं. जे दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांनादेखील दहशतवादाचा फटका बसू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

जे दहशतवादाचा वापर करताहेत...; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

अफगाणिस्तान, दहशतवाद, कोरोना संकट, लसीकरण, हवामान बदल अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केलं. जगात सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. छुपी युद्धं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला, महिलांना, लहान मुलांना, अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं मोदी म्हणाले.

जगासमोर कट्टरतावादाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगतीशील विचार वाढायला हवेत. समुद्र हा आपल्याकडे असणारा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रातील संसाधनांचा वापर करायला हवा, गैरवापर करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापारात समुद्र आपल्यासाठी लाईफलाईन आहेत. त्यामुळे आपण समुद्रांना विस्तारवादाच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत