शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:08 IST

India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन परदेशी आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचे पाणी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानने ही युद्धाचीच घोषणा असल्याचा दावा करत अधिकारासाठी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एलओसी मानणारा शिमला करारही निलंबित केला आहे. या हल्ल्याचा भारत बदला घेणार अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानने रणगाडे, मिसाईल आदी शस्त्रास्त्रे सीमेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पाकिस्तान युद्धाची तयारी करू लागला आहे. 

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन पाकिस्तानी आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात आहे. २२ मार्चला हल्ला झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाकिस्तानी लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली होती. ही त्यांची कृती नेहमीची नव्हती. तसेच भारतीय सीमेजवळून टेहळणी विमानही गेले होते. आता पाकिस्तान भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणत असल्याचे समोर येत आहे. 

सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्य सीमेवर मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे. दोन अतिरिक्त रेजिमेंट तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच टँक, चिलखती वाहने देखील मोठ्या संख्येने सीमेकडे नेली जात आहेत. लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडण्याचा सराव करत आहेत. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

भारत काय करतोय...पाकिस्तानने तिकडे तयारी सुरु केलेली असताना भारतानेही तयारी सुरु केलेली आहे. हवाई दलाने राजस्थानमध्ये युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामध्ये राफेल लढाऊ विमाने देखील सहभागी झाली आहेत. हवेतून सपाट जमिनीवर तसेच डोंगररागांमध्ये हल्ला करण्याचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. याचे नाव आक्रमण असे ठेवण्यात आले आहे. तसेच भारतीय सैन्याला सीमेवर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत