शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:09 IST

२२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला

इस्लामाबाद - पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीत भारत अशा देशांची ओळख पटवत आहे जे स्वत:ला भारताचे मित्र मानतात. त्याशिवाय अशा शत्रूंना शोधले जात आहे जे थेट पाकिस्तानसोबत जाऊन उभे राहतील. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत आहेत. त्यातच पाकिस्तानला कराची आणि लाहोरबाबत चिंता सतावत आहे. त्यातच ज्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तुर्कीला मदत केली, त्यांनीच पाकच्या कराची पोर्टला युद्धनौका आणून उभी केली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने मिलिट्री प्लेनने पाकिस्तानला युद्ध साहित्य पाठवले होते. त्यानंतर आता कराची पोर्टवर त्यांच्या नौदलाची युद्धनौका उभी केली आहे. एंटी सबमरीन तंत्रज्ञानाच्या या तुर्कीश शिपचं नाव TCG BUYUKADA असं आहे. ही युद्धनौका कराचीला पोहचताच पाकिस्तानी सैन्य खुश झाले आहे. तुर्किश युद्धनौका दोन्ही देशातील नौदलाला सागरी सहकार्य करेल असं पाक नौदलाने म्हटलं. तुर्की देशाने आजपर्यंत कायम पाकिस्तानची बाजू घेतली आहे. कराचीत तुर्की नौदलाचे अधिकारी पाकिस्तानी सैनिकांसोबत संवाद साधतील. 

माहितीनुसार, तुर्की आणि पाकिस्तानी नौदल एकत्रितपणे युद्धसराव करणार आहेत. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला. आता तुर्की उघडपणे पाकिस्तानसोबत उभा राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुर्कीविरोधात कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी आतापासून होऊ लागली आहे. एका रिपोर्टनुसार, तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा सैन्य शस्त्राचा पुरवठा करणारा देश आहे. तो ड्रोन, युद्धनौका, एंटी टँक मिसाईलसह पाकिस्तानला F16 अपडेट करण्यास मदत करत आहे.

दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूरात सूर मिसळले आहेत. याआधीही मलेशियाने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरून पाकिस्तानला साथ देत भारतावर टीका केली होती. त्यावेळी भारताने मलेशियातून ऑयल आयात घटवले, त्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर झाला. भारताने धडा शिकवल्यापासून मलेशियाने काही वर्ष काश्मीरवर मौन बाळगले परंतु आता त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी या पाकिस्तानी मागणीला मलेशियाचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला