शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:09 IST

२२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला

इस्लामाबाद - पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीत भारत अशा देशांची ओळख पटवत आहे जे स्वत:ला भारताचे मित्र मानतात. त्याशिवाय अशा शत्रूंना शोधले जात आहे जे थेट पाकिस्तानसोबत जाऊन उभे राहतील. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत आहेत. त्यातच पाकिस्तानला कराची आणि लाहोरबाबत चिंता सतावत आहे. त्यातच ज्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने तुर्कीला मदत केली, त्यांनीच पाकच्या कराची पोर्टला युद्धनौका आणून उभी केली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने मिलिट्री प्लेनने पाकिस्तानला युद्ध साहित्य पाठवले होते. त्यानंतर आता कराची पोर्टवर त्यांच्या नौदलाची युद्धनौका उभी केली आहे. एंटी सबमरीन तंत्रज्ञानाच्या या तुर्कीश शिपचं नाव TCG BUYUKADA असं आहे. ही युद्धनौका कराचीला पोहचताच पाकिस्तानी सैन्य खुश झाले आहे. तुर्किश युद्धनौका दोन्ही देशातील नौदलाला सागरी सहकार्य करेल असं पाक नौदलाने म्हटलं. तुर्की देशाने आजपर्यंत कायम पाकिस्तानची बाजू घेतली आहे. कराचीत तुर्की नौदलाचे अधिकारी पाकिस्तानी सैनिकांसोबत संवाद साधतील. 

माहितीनुसार, तुर्की आणि पाकिस्तानी नौदल एकत्रितपणे युद्धसराव करणार आहेत. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव वाढला आहे. त्यात अरबी समुद्रात दोन्ही देशांनी नौदलाचा अभ्यास केला. आता तुर्की उघडपणे पाकिस्तानसोबत उभा राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तुर्कीविरोधात कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी आतापासून होऊ लागली आहे. एका रिपोर्टनुसार, तुर्की पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा सैन्य शस्त्राचा पुरवठा करणारा देश आहे. तो ड्रोन, युद्धनौका, एंटी टँक मिसाईलसह पाकिस्तानला F16 अपडेट करण्यास मदत करत आहे.

दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूरात सूर मिसळले आहेत. याआधीही मलेशियाने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरून पाकिस्तानला साथ देत भारतावर टीका केली होती. त्यावेळी भारताने मलेशियातून ऑयल आयात घटवले, त्याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर झाला. भारताने धडा शिकवल्यापासून मलेशियाने काही वर्ष काश्मीरवर मौन बाळगले परंतु आता त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी या पाकिस्तानी मागणीला मलेशियाचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला