शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 20:02 IST

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.वाढत्या तापमानामुळे आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी जवळपास संपुष्टात यायला लागलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्वच्छ पाण्याची वाफ होण्याचा वेग इतका भयानक आहे, की त्यामुळे काही वर्षांत पाण्याचे साठे कोरडेठाक होऊ शकतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे दोन लाख लोकांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतक्या पाण्याची केवळ वर्षभरातच वाफ होतेय!भारतात पावसामुळे वर्षभरात सुमारे चार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं. त्यातल्या जवळपास अर्ध्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते.

‘नॅशनल कमिशन ऑन इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी खुद्द सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार दरवर्षी पावसामुळे जे चार हजार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी उपलब्ध होतं, त्यातील २१३१ अब्ज घनमीटर पाणी उष्णतेमुळेच उडून जातं. जे १८६९ अब्ज घनमीटर पाणी उरतं, त्यातील केवळ ११२३ अब्ज घनमीटर पाणी वापरण्यायोग्य असतं. त्यातीलही फक्त ६९९ अब्ज घनमीटर पाणी भूपृष्ठावर राहातं, तर ४३३ अब्ज घनमीटर पाणी जमिनीखाली जातं.

केवळ वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याचं संकट इतकं गंभीर होत चाललंय, पण या गोष्टींकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही.ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे निसर्गाचं सगळं चक्रच उलटंपालटं होत असताना माणसाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतं आहे. भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने खालावत चालले आहेत. आपल्या भावी पिढ्यांसमोर तर जलसंकटाचा धोका खूपच मोठा आहे.

सरकारच्याच अनुमानानुसार आणखी सहा वर्षांनी म्हणजे २०२५मध्ये भारताच्या जवळपास १३९.४ कोटी लोकसंख्येसाठी वर्षाला प्रतिव्यक्ति केवळ १३४१ घनमीटर पाण्याची उपलब्धता असू शकेल. भारतात २०११मध्ये प्रतिव्यक्ति पाण्याची हीच उपलब्धता १५४५ घनमीटर होती. त्याचवेळी एशियन रिसर्च डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटनं आंतरराष्ट्रीय मानकांचा हवाला देऊन इशारा दिला आहे की, ज्या देशांत प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ति पाण्याची उपलब्धता १७०० घनमीटरपेक्षा कमी आहे, ते देश जलसंकटग्रस्त देश आहेत. 

टॅग्स :WaterपाणीResearchसंशोधन