शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 20:02 IST

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.वाढत्या तापमानामुळे आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी जवळपास संपुष्टात यायला लागलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्वच्छ पाण्याची वाफ होण्याचा वेग इतका भयानक आहे, की त्यामुळे काही वर्षांत पाण्याचे साठे कोरडेठाक होऊ शकतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे दोन लाख लोकांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतक्या पाण्याची केवळ वर्षभरातच वाफ होतेय!भारतात पावसामुळे वर्षभरात सुमारे चार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं. त्यातल्या जवळपास अर्ध्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते.

‘नॅशनल कमिशन ऑन इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी खुद्द सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार दरवर्षी पावसामुळे जे चार हजार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी उपलब्ध होतं, त्यातील २१३१ अब्ज घनमीटर पाणी उष्णतेमुळेच उडून जातं. जे १८६९ अब्ज घनमीटर पाणी उरतं, त्यातील केवळ ११२३ अब्ज घनमीटर पाणी वापरण्यायोग्य असतं. त्यातीलही फक्त ६९९ अब्ज घनमीटर पाणी भूपृष्ठावर राहातं, तर ४३३ अब्ज घनमीटर पाणी जमिनीखाली जातं.

केवळ वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याचं संकट इतकं गंभीर होत चाललंय, पण या गोष्टींकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही.ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे निसर्गाचं सगळं चक्रच उलटंपालटं होत असताना माणसाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतं आहे. भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने खालावत चालले आहेत. आपल्या भावी पिढ्यांसमोर तर जलसंकटाचा धोका खूपच मोठा आहे.

सरकारच्याच अनुमानानुसार आणखी सहा वर्षांनी म्हणजे २०२५मध्ये भारताच्या जवळपास १३९.४ कोटी लोकसंख्येसाठी वर्षाला प्रतिव्यक्ति केवळ १३४१ घनमीटर पाण्याची उपलब्धता असू शकेल. भारतात २०११मध्ये प्रतिव्यक्ति पाण्याची हीच उपलब्धता १५४५ घनमीटर होती. त्याचवेळी एशियन रिसर्च डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटनं आंतरराष्ट्रीय मानकांचा हवाला देऊन इशारा दिला आहे की, ज्या देशांत प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ति पाण्याची उपलब्धता १७०० घनमीटरपेक्षा कमी आहे, ते देश जलसंकटग्रस्त देश आहेत. 

टॅग्स :WaterपाणीResearchसंशोधन