शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका, युद्धात मध्यस्थीसाठी भारत सहभागी होऊ शकतो; इराणनं दाखवला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:29 IST

संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही

तेहरान - इराण युद्धात पाकिस्तान स्वत:ला मध्यस्थ देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यात त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला पाठवलेले अमेरिकेच्या १५ अटींचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला. त्यानंतर पाकिस्तान निवडक इस्लामी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्‍यांची बैठक घेऊन पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करू लागला. परंतु आता इराणच्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वेगळी माहिती समोर आली आहे. इराणला भारताला मित्र राष्ट्र सांगत अमेरिकेसोबत चर्चेसाठी भरवसा असणारा देश म्हणून भारताचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे इराणच्या सरकारी सूत्रांनी प्रश्न उभे केलेत.

रिपोर्टनुसार, भारत हा इराणचा मित्र आहे. त्यामुळे भारत चर्चेत सहभागी होऊ शकतो. अमेरिकेसोबत मध्यस्थी करताना पाकिस्तानच्या भूमिकेवर इराणने शंका व्यक्त केली. पाकिस्तान कुठल्याही निकालाचे श्रेय घेऊ इच्छितो. आम्ही वाटाघाटी सुरू केल्याचे सर्व दावे फेटाळून लावतो किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केलेले दावे ज्यात आम्ही त्यांच्या १५-कलमी शांतता प्रस्तावाला सहमत आहोत हेही नाकारतो. संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही असंही इराणच्या सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. CNN-News 18 ने हा रिपोर्ट प्रसारित केला आहे. 

इस्लामिक देशांना एकत्रित करून पाकिस्तान करतंय वातावरण निर्मिती

जेव्हा पाकिस्तान जगातील सर्वात शक्तिशाली मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना एकत्र करून स्वतःला शांततेचा दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी हा रिपोर्ट आला आहे. केवळ एक दिवस आधी पाकिस्तानने अमेरिका-इराण चर्चेसाठी इस्लामाबादला एक ठिकाण म्हणून प्रस्तावित केले. सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा प्रस्ताव आला, ज्यामध्ये संघर्ष तात्काळ संपवण्यावर भर देण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये झालेल्या तीन देशांच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी आखाती संकटावर संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव खरा उपाय आहे असा पुनरुच्चार केला. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार चार देशांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव आणि संघर्ष तात्काळ संपवण्याचे आवाहन केले. या बैठकीत चार देशांनी मुस्लिम ऐक्यावर भर दिला आणि अमेरिका व इराण यांच्यातील चर्चेला पाठिंबा दिला.

भारतावर दाखवला विश्वास

भारत आणि इराण यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांमधील हे संबंध १९५० च्या दशकापासून सुरू झाले होते. एकेकाळी भारत हा इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक होता परंतु भूराजकीय परिस्थितीमुळे त्यात घसरण झाली. तरीही भारताने इराणसोबत संबंध कायम ठेवले. भारत आणि इराण यांच्यात चाबहार बंदराबाबत मोठा करार झाला आहे. याशिवाय भारताला युरोपशी जोडणाऱ्या अनेक आर्थिक कॉरिडॉरमध्ये इराणचाही समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran distrusts Pakistan's role; India can mediate in conflict.

Web Summary : Iran questions Pakistan's mediation, rejecting its proposals. Iran trusts India for dialogue with the US, citing strong ties. Pakistan's efforts to unite Islamic nations are viewed skeptically. India and Iran share historical and strategic relations, including the Chabahar port deal.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणPakistanपाकिस्तानIndiaभारत