शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

'स्वाधार'च्या विद्यार्थ्यांना निधीच्या आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

हिंगोली : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील २०१९-२० मधील बहुतांश पात्र विद्यार्थ्यांना अद्याप भोजन, निर्वाह व निवासासाठीची पूर्ण मदत ...

हिंगोली : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील २०१९-२० मधील बहुतांश पात्र विद्यार्थ्यांना अद्याप भोजन, निर्वाह व निवासासाठीची पूर्ण मदत मिळाली नाही. त्यामुळे ‘स्वाधार’चा या विद्यार्थ्यांना केव्हा आधार मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत भोजन, निर्वाह व निवासासाठी ठरावीक रक्कम दिली जाते. या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील ६५२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांतील ३५४ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. यांतील ३४६ पात्र विद्यार्थी व ११४ नियमित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी एक कोटी १४ लाख १२ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. मात्र त्यांना दुसरा हप्ता अद्याप मिळाला नाही. तसेच ४८ विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा पहिला व दुसरा हप्ता देण्याचे बाकी आहे. ही रक्कम थकल्याने विद्यार्थी समाजकल्याण कार्यालयात विचारणा करीत आहेत.

आवश्यकता ६५ लाखांची

स्वाधार योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना थकीत रकमेची प्रतीक्षा आहे. यासाठी ६५ लाख ३६ हजार रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास स्वाधार योजनेतील पात्र विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

कोरोनामुळे योजना थंड बस्त्यात

मागील दीड वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वांत जास्त फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसह व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात जाता आले नाही. वसतिगृहही बंद ठेवावे लागले. याचा परिणाम स्वाधार योजनेवर झाला. दोन वर्षांपासून स्वाधार योजनेसाठी अर्जच मागविण्यात आले नाहीत.

अशी मिळते मदत

स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. दिव्याांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, आदी मोठ्या शहरांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी ६० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते. इतर महसूल विभाग व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ५१ हजार, तर उर्वरित ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपयांपर्यंत भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात दिले जातात.

प्रतिक्रिया...

स्वाधार योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

- शिवानंद मिनगिरे, साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली