शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय ; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी ...

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची कसून तपासणी ही केली जात आहे. एवढेच काय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ही लावला जात आहे. एवढे कडक नियम असतानाही काही जण मात्र रस्त्याने फिरताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा धोका ओळखून नागरिकांनी बाजारात विनाकारण व विनामास्क फिरु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने दिल्या आहेत. लसीचा पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन हे दोन्ही डोस आतापर्यंत ८ हजार ६९७ जणांना दिले आहेत.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात कोणीही पॉझिटिव्ह नाही लसीकरणाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. परंतु, कोणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. लसीकरणानंतर ताप आल्यास आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लस घेतल्यास ताप येतो पण लगेच उतरुनच जातो. उलट लस ही आरोग्यास लाभदायक आहे. काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस महत्त्वाचीच ; मृत्यूचा धोका कमी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस महत्त्वाच्या आहेत. यामुळे मृत्यूचा धोका कमीच आहे. दोन्ही लस घेतल्यास आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे लाभदायक अशा आहेत. तेव्हा नागरिकांनी लस आवश्य घ्यावी.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०३ टक्के पॉझिटिव्ह

दोन्ही डोस नंतर जिल्ह्यात ०.०३ टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणात आहे. अंग दुखणे, ताप येणे, डोके जड पडणे या समस्या कोणतेही इंजेक्शन घेतल्यानंतर येतच असतात. कोरोना महामारीला दूर सावरणारी लस आहे. लस घेण्यात कोणीही हयगय करु नये.

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वत:ची व इतरांची काळजी करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्याने करावा. बाजारात जाणे टाळावे. नागरिकांनी लसीकरण मात्र आवश्य करुन घ्यावे.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक