शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने मरण्यापेक्षा जेलमध्ये राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

हिंगोली : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह कामगार, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय ...

हिंगोली : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह कामगार, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा प्रशासनाचे आदेश झुंगारून प्रतिष्ठाणे उघडण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लॉकडाऊनने मरण्यापेक्षा कायदेभंग करून जेलमध्ये राहू, अशी संतप्त भूमिका घेत ७ एप्रिल रोजी शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या निषेधाचे फलक फडकावून आंदोलन केले.

शहरातील जवाहर रोडवरील बंद दुकानांसमोर निषेधाचे फलक हातात घेऊन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कॅटचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शहर अध्यक्ष सुमीत चौधरी, हमीद प्यारेवाले आदी व्यापारी उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊनचा विरोध करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यात कुठेही संचारबंदी नसताना हिंगोली जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. तसेच वेळोवेळी घातलेले निर्बंध व संचारबंदीस व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे व्यापारी, कारखानदार, मजूरदार अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश वर्गाला काही ना काही साहायता मिळाली. व्यापाऱ्यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट व्यापाऱ्यांना प्रत्येक प्रकारचे कर, वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे. गाळ्यांचे भाडे माफ करण्याच्या विनंतीचीही दखल घेतलेली नाही. कराचा भरणा केला नसल्याने प्रशासनाच्या कठोर कार्यवाहीस सामोरे जावे लागले आहे. व्यापाऱ्यांमुळेच कोरोना होतो, अशी समजूत शासन व प्रशासनाने करून घेल्यामुळे सर्व निर्बंध व्यापाऱ्यांवरच लावले जात आहेत. व्यापाऱ्यांना कुटुंब, घर आहे. त्यांच्यावर अनेक कुटुंब अवलंबवून आहेत. यापूर्वी व्यापार, व्यवसाय बंद असतानाही हजारो प्रवासी, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. तरीही व्यापाऱ्यांना शासकीय यंत्रणेकडून प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय व्यापाऱ्याच्या मुळावर उठला आहे. लॉकडाऊमुळेच व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा.

कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच सक्तीने चाचणी करावी, त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही कमी होईल आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सुटून प्रशासनास सहकार्य होईल.

६ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रचंड आर्थिक व मानसिक तणाव निर्माण होत आहे. आर्थिक व मानसिक तणावाने मरण्यापेक्षा कायदेभंग केल्याबद्दल जेलमध्ये राहिलेले बरे, ह्या निर्णयाप्रत व्यापारी आलेले आहेत.

फोटो : ०२