शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ...

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. परंतु, सात दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी संचारबंदी उठविताच भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी व विक्रीसाठी एकच झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

मागील वीस-पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी लागू केली होती. परंतु, कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढूच लागले होते. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून १ मार्च ते ७ मार्च या अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते. एवढे असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे मात्र फिरणे काही थांबत नव्हते. सात दिवस सुरु केलेल्या टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायिकांचे मात्र चांगलेच हाल झाले. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांना तर अर्धपोटीच उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

८ मार्चपासून नियम व अटी घालत संचारबंदी उठविली जाणार असल्याची माहिती कळताच भाजीमार्केटमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजी खरेदी-विक्रीसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील डिग्रस, जवळाबाजार, हट्टा, कुरुंदा, सेनगाव, पानकनेरगाव, औंढा, वारंगाफाटा, सवड, गोरेगाव, कन्हेरगावनाका, साखरा आदी ग्रामीण भागांतूृन भाजीपाला व्यवसायिकांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. शहरातील किरकोळ विक्रेते हे ठोक विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करताना पहायला मिळाले.

विनामास्क खरेदी-विक्री

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासन विनामास्क फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना देत आहे. परंतु, या सुचनांचा काही लोकांवर काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. सोमवारी तर भाजी मार्केटमध्ये विनामास्क खरेदी-विक्री केल्याचे पहायला मिळाले. बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी मास्क घालून पालेभाज्यांची विक्री करताना आढळून आले.

फोटो